नमस्कार
आज आपण जाणून घेणार आहोत”पृथ्वीचा आकार सांगणारा ज्योतिषशास्त्रज्ञ वराहमिहीर”यांच्या विषयी…

उज्जैनी मगध साम्राज्यातील विद्वंतांची नगरी,अत्यंत प्रीतीतली, बुद्धिमंतांची आश्रयदाती, या नगरीच्या मातीत जन्मलेले “वराहमिहीर” आदित्यब्राह्मणाचा पुत्र. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान या विषयात भरपूर लेखन… त्यांच्या ग्रंथाचा परिचय करून देणारा निवेदक, भाटोत्पल याने, वराहमिहिराबाबत बरेच लिहून ठेवले आहे.त्यामुळेच वराहमिहिराबद्दल जास्त माहिती मिळते. वराहमिहिरांचे ग्रंथ तीन वर्गात विभागता येतात. पहिला वर्ग ग्रह ज्योतिष विज्ञान, दुसरा आणि तिसरा मुख्यतः फलज्योतिष- विज्ञान.
पहिल्या ग्रज्योतिष-विज्ञान या वर्गात त्यावेळी प्रचलित असलेल्या पौलुस,रोमक, वशिष्ठ, सूर्य आणि पैतामह या पाच सिद्धांताबाबत चर्चा,उहापौह आणि टीका आहे. याशिवाय आर्यभट्ट यांच्या संशोधनकार्यावर आधारित अशा दुरुस्त्या, बदल आणि सुधारणा, वराहमिहीराणी पंचसिद्धांत या ग्रंथात केल्या आहेत. वर्षातील कालविभाग अगदी छोट्या छोट्या एककात कशी करता येतात, साठ वर्षाच्या काल मानाने एक चक्र कसे असते आणि त्यातील वर्षे,दिवस, तास यांचा तपशील काय आहे,त्यांच्या नियंत्रक देवता कोणत्या,हा सारा उहापोह त्यांच्या ग्रंथात त्यांनी केला आहे .
कालमापनासाठी वापरली जाणारी छायापद्धती आणि “केप्सीड्रा” जलयंत्र यांच्यातील तुलना गणितीपद्धतीने त्यांनी केली आहे. प्रत्येक ग्रहाचे पृथ्वीपासून योजनात अंतर, भ्रमणकक्षेच्या परिसीमा, पृथ्वीचा आकार,ध्रुवाजवचा चपटेपणा,नक्षत्रांचा उदयास्त, कालमापन यंत्रे याबाबतीत भूमितीचा कुशलतेने वापर.पृथ्वीचा आकार चेंडूसारखा आहे, हे त्यांनी प्रथम सांगितले. फलज्योतिषावर त्यांनी बृहतजातक या ग्रंथ लिहिला.त्यांची ब्रहत्संहिता अजून उपलब्ध आहे. ग्रीक विज्ञानाबद्दल त्यांना आदर होता. त्यांच्या ग्रंथाचा मानाने उपयोग केला आहे. ब्रहत्संहिता या ग्रंथात त्यांनी कृषीशास्त्रावर लेखन केले आहे. त्यात पेरणी लावणी हवामानाचा परिणाम यावर चर्चा केली आहे.
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक
प्रा.भालबा केळकर
संकलन- डॉ. बी. व्ही. लिंबाळकर