डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळवला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. त्यामुळे अनेक वैज्ञानिक भारतात निर्माण झाले. विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.
परतंत्र भारतात आधुनिक विज्ञानाची पायाभरणी करणार्या जगदीशचंद्र बोस (1858-1937), आचार्य प्रफुल्लचंद्र राय (1861-1944), सर आशुतोष मुखर्जी (1864-1924) अशा दिग्गज वैज्ञानिकांच्या मालिकेत प्रा.डॉ. तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचाही समावेश होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करायचे, तर ज्ञानार्जनाची आस, विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असे करता येईल. त्यांच्या जीवनाचा आलेख प्रेरणादायक आणि अचंबित करणारा ठरेल.
शेषाद्रींचा जन्म 3 फेब्रुवारी 1900 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीमधील (तामिळनाडूमधील) चेरा राजघराण्याशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेल्या कुलिथताई या गावात झाला. तिरुवेंगाडस अय्यंगार आणि नामगिरी अम्मल यांचे ते सुपुत्र. त्यांचे वडील शाळेत अध्यापन करीत. घराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. बालपणातील सद्गुणांची त्यांची शिदोरी त्यामुळेच समृद्ध झाली. तर्कशुद्ध विचारसरणीची आणि शिस्तबद्ध जीवनाची जडणघडण बालपणातच झाली.
गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना श्रीरंगमला पाठविण्यात आले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी तिरुचिरापल्लीच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रभक्तीने भारलेल्या संस्थापकांनी या महाविद्यालयाची स्थापना केली असल्याने शेषाद्रींवरही प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले.
नंतर त्यांनी बी.एस्सी. ऑनर्स पदवीसाठी तत्कालीन मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्ययन केले. त्या वेळी त्यांना विख्यात रसायनशास्त्रज्ञ प्रा. नारायण अय्यर आणि डॉ. बिमन बिहारी डे यांचे मार्गदर्शन लाभले आणि रसायनशास्त्राची गोडी निर्माण झाली. पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि सेंद्रिय रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. डे यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय औषधी वनस्पती व विशेषत: अनंतमूळ व कोरफड यावर संशोधन केले.
घरचे दारिद्य्र असल्यामुळे मद्रासमधील खर्चीक वास्तव्य परवडणारे नव्हते. त्यामुळे पुढच्या संशोधनात मोठी अडचण निर्माण झाली. त्यावर उपाय शोधताना त्यांना रामकृष्ण मिशनच्या स्टुडंट्स होमने आश्रय दिला. तेथे राहिल्यामुळे साध्या राहणीचे व शिस्तपालनाचे संस्कार झाले. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचे संतुलन साधण्याचे धडे मिळाले. या वास्तव्यात त्यांना एम.एस्सी. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले.
पदव्युत्तर शिक्षण व संशोधन…
1927 मध्ये प्रा. शेषाद्री यांना ‘ओव्हरसीज टेक्निकल स्कॉलरशिप’ने गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांना मँचेस्टर विद्यापीठामध्ये विख्यात सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाची संधी प्राप्त झाली. पुढे रॉबर्ट रॉबिन्सन यांना 1947 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. शेषाद्रींच्या संशोधनाचा विषय होता मलेेरिया प्रतिबंधक औषधे शोधणे आणि ‘अँथोसायनिन’चे संयुग तयार करणे. रॉबिन्सन यांच्यामुळे अन्य प्रख्यात वैज्ञानिकांशी त्यांंना संपर्क साधता आला.
डॉ. शेषाद्रींच्या साठाव्या वाढदिवसाच्या वेळी रॉबिन्सन यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची, संशोधक वृत्तीची आणि कार्यक्षमतेची खूप प्रशंसा केली. त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यापन कौशल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार प्रकट केले. त्या काळात शेषाद्री यांनी युरोेपमधील अनेक संशोधन संस्थांमध्येही संशोधन केले. 1929 मध्ये ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते डॉ. फ्रिट्ज प्रेगेल यांच्याबरोबर ‘ऑरगॅनिक मायक्रोअॅनालिसिस’ तंत्रावरही मोलाचे संशोधन केले.
1930 साली प्रा. शेषाद्री भारतात परतले. तो काळ प्रचंड धामधुमीचा होता. जुलमी ब्रिटिशांनी सर्वच क्षेत्रांत भारतीयांना धाकदडपशाहीने ठेवण्याचा आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला होता. अशा परिस्थितीत आपल्या पसंतीची संधी मिळविणे डॉ. शेषाद्रींना दुरापास्त झाले. तरीही अखेरीस त्यांना मद्रास विद्यापीठात संशोधनाची अधिछात्रवृत्ती मिळाली.
नंतर कोइंबतूरच्या कृषी संशोधन संस्थेत मृदाशास्त्र विभागात मोठी संधी मिळाली. यानंतर मात्र त्यांच्या सहनशक्तीची कसोटी पाहणार्या जबाबदार्यांना त्यांना सामोरे जावे लागले. आंध्र युनिव्हर्सिटीच्या नवीन सुरू होणार्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुखपद त्यांना मिळाले. त्याची सर्वांगांनी उभारणी करणे हे फार मोठे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले. सुदैवाने त्यांना संस्थापक उपकुलगुरू सर सी.आर. रेड्डी आणि नंतरचे उपकुलगुुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मोलाची मदत केली. त्याच काळात दुसर्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि ब्रिटिश राजवटीचे जुलूम वाढले.
डॉ. शेषाद्रींनी कष्टपूर्वक उभारलेल्या प्रयोगशाळांचा आणि शैक्षणिक सुविधांचा कब्जा ब्रिटिश लष्कराने घेतला. त्या ठिकाणी लष्करी इस्पितळाची उभारणी करण्यात आली. अशा परिस्थितीतच त्या विशाखापट्टणम शहरावर जपानी विमानांनी बाँब हल्ले केले. 482 किलोमीटर अंतरावरील गुुंटुर या ठिकाणी विद्यापीठाचे तातडीने स्थलांतर केले गेले. तात्पुरते मांडव उभे करून त्यात काम सुरू झाले. शिवाय दोन स्थानिक महाविद्यालयाच्या इमारतींचा आश्रय त्यासाठी घेण्यात आला. अर्थातच प्रयोगशाळेला लागणारी उपकरणे व रसायने यांचा आयात पुरवठा पूर्णत: थांबला. या कठीण परिस्थितीमध्येसुद्धा डॉ. शेषाद्रींनी संशोधन कार्य चालू ठेवले, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व डॉक्टरेट पदव्या प्राप्त करून दिल्या. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
युद्धसमाप्तीनंतर विद्यापीठाने आपले काम पूर्ववत उभे करण्याचा आटोकाट प्रयत्न यशस्वी केला. 1949 मध्ये डॉ. शेषाद्री दिल्लीच्या दिल्ली विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून नियुक्त झाले. काही काळानंतर त्यांच्याकडे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्षपद चालत आले, परंतु ते स्वीकारायला त्यांनी नकार दिला. कारण त्यांच्या आवडत्या संशोधन आणि अध्यापन कार्यात त्यामुळे व्यत्यय आला असता. डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळविला.
अखंडितपणे 24 तास मिळणार्या सुविधांचा लाभ त्यांना प्रा. शेषाद्रींमुळे घेता आला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. यामुळे पुढे 1962 साली यूजीसीने त्यांच्या विभागाला अतिप्रगत संशोधन केंद्र म्हणून अधिकृतपणे सन्मानित केले. त्याचे नामकरण झाले ‘द अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर द केमिस्ट्री ऑफ नॅचरल प्रॉडक्ट्स’ आणि शेषाद्री त्याचे पहिले संचालक झाले.
1965 साली ते निवृत्त झाले, परंतु त्यांची गुणवत्ता श्रेणी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) म्हणून सन्माननीय नियुक्ती झाली. शेवटच्या निवृत्तीनंतर त्यांनी आपला प्रचंड ग्रंथसंग्रह दिल्ली विद्यापीठाला देणगी म्हणून दिला.
डॉ. शेषाद्री हे ज्येष्ठ वैज्ञानिक होते, तसेच आध्यात्मिक वृत्तीचेही होते. त्यांच्या मते केवळ विज्ञान विकास हा एकांगी ठरेल. त्याला आध्यात्मिक विचारांची व शिक्षणाची जोड पाहिजेच. त्यांनी त्यासाठी दिल्ली विद्यापीठात वेदान्त समितीची स्थापना केली. त्यासाठी त्यांना रामकृष्ण मिशनचा सहयोग मिळाला.
1962 साली डॉ. शेषाद्रींना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1966 साली प्रा. एन.व्ही. सुब्बाराव यांनी नोबेल पुरस्कारासाठी त्यांची शिफारस केली होती.
डॉ. शेषाद्री यांचे हे निष्ठावान वैज्ञानिकाचे व्यक्तिमत्त्व युवा पिढीला प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही. “Money and materials alone do not secure good research, they are only adjuncts and it is the human element behind them that matters” हे त्यांचे उद्गार अगदी अर्थपूर्ण आहेत.
काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.
17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.
1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. त्याच विषयात त्यांनी 1988 मध्ये PhD पूर्ण केली.
हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर…
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली. नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.
नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.
त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.
नोव्हेंबर 1996मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.
शेवटी तो दिवस उजडलला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.
एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.
कल्पना यांचा शेवटचा प्रवास…. नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.
जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.
1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.
त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.
22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.
तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.
ज्या दिवशी कल्पना चावला अंतराळात गेली, त्याच दिवशी तिचा मृत्यू होणार होता हे नासाला माहित होतं. केवळ कल्पनाच नाही, तर तिच्यासोबत असलेल्या 7 प्रवाशांच्या अंताचा अलार्मही डिस्कव्हरी फ्लाइटने वाजवला होता.
1 फेब्रुवारीचा दिवस जगातील अंतराळ शास्त्रज्ञांच्या हृदयात एक दुःख वेदना बनली आहे. 1 फेब्रुवारी 2003 रोजी यूएस स्पेस शटल कोलंबिया हे अंतराळ मोहीम संपवून पृथ्वीच्या वातावरणात परतत असताना क्रॅश झाले आणि त्यात सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. या अपघातात भारताच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचाही मृत्यू झाला होता. मात्र, कल्पना चावलासह सर्व अंतराळवीरांचा मृत्यू होणार आहे, हे नासाला आधीच माहिती होतं. तरीही त्यांनी याची माहिती का दिली नाही
भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी, सुसंस्कृत माणसे तयार झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर, प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून, थोर विचारवंत म्हणून ‘होमी जहागीर भाभा’ यांचे नाव भारतात मोठ्या आदराने व प्रेमाने घेतले जाते.
स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. होमी भाभा यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली.
वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले.
१९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. होमी भाभांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली,तेव्हा मुल कण, नवे सिद्धांत नवे तंत्रे उदयास आली होती. त्यात भाभांनी भर टाकली.
अंतराळातून येणाऱ्या विश्वकिरणात समुद्रासपाटीला असलेल्या वातावरणातील कवच फेटून इलेक्ट्रान कसे पोहोचतात आणि विश्वकिरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा होतो,याचा कॉस्केड थिअरीने करण्यात त्यांना यश मिळविले प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रोनची पदार्थाशी आंतरक्रिया होताच त्यातून गॉमा किरण बाहेर पडतात. त्या किरणांमुळे इलेक्ट्रोन वा पॉझिट्रौन यांचे विकरण कसे होते, याचा सिद्धांत मांडतांना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईस्टाईच्या सिद्धांतानुसार होणारी कालवृद्धी लक्षात पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले.
त्यांनी अनेक संस्था उभारल्या. तुर्भ, तारापूर अणुशक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मुलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग,ऊर्जा आयोग,अवकाश संशोधन, कॉन्सर संशोधन अशा मानवकल्याणकारी संस्थातून अणुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले.
त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. भारत सरकारने १९५४ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
त्यांच्या निधना नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन त्यात होमी भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
गणिती प्रज्ञावंतांना सहसा त्यांच्या योगदानानुसार उत्तम आणि अत्युतम अशा दोन वर्गात विभागले जाते. पण काही गणितज्ञ अपवादात्मक असामान्य अशा तिसर्या वर्गात मोडतात. अशा मोजक्या प्रतिभावंतांमध्ये भारताचे श्रीनिवास रामानुजन यांचा समावेश असणे आपल्यासाठी गौरवास्पद आहे.
वयाच्या दहाव्या वर्षी गणिताची ओळख झालेल्या मद्रास प्रांतातील रामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेपासूनच थक्क करणारी होती. पण दुसर्या विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते महाविद्यालयातील स्नातक पदवी मिळवू शकले नाहीत. पोटापाण्यासाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी पत्करली व वेळ मिळेल तेव्हा त्यांनी गणितात संशोधन चालूच ठेवले.
त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक जी. एच. हार्डी यांना एका नऊपानी पत्रात आपले काही गणिती शोध कळवले. ते वाचून प्राध्यापक हार्डी अचंबित झाले व त्यांनी रामानुजनला 1914 मध्ये इंग्लंडला बोलवून घेतले. तेथे त्यांच्या प्रतिभेला आणखीन पंख फुटले व त्यांनी मूलभूत असे काम करून अनेक सिद्धांत मांडले. मात्र इंग्लंडमधील हवामान आणि रामानुजन यांची सनातन कर्मठ जीवनशैली यांचा मेळ जमेना. प्रकृती ढासळल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात राहावे लागे. शेवटी 1919 मध्ये ते मायदेशी परतले.
केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास 4000 सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.
ते सांगत की, झोपेत असताना असंख्य अतिशय प्रगत गणिती सूत्रे असणारी त्यांना स्वप्ने पडत असत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत व ती सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेत. कदाचित अशा निष्पाप, अतिशय संवेदनशील ग्रहणशीलता व तरल चित्तवृत्तीमुळेच त्यांना ती सूत्रे स्वप्नात दिसत असावित. , रोखठोक तर्कशात्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण झालेल्यांना ती सहसा दिसणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे मानणे रास्त ठरेल.
रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आजदेखील संशोधकांना आव्हान असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत. 1997 पासून ‘द रामानुजन र्जनल’ नावाचे एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध होत असून त्यात त्यांच्या कार्याशी निगडित असे दर्जेदार शोधलेख प्रसिद्ध होतात. 2005 पासून विकसनशील देशातील 45 वर्षांहून कमी वय असलेल्या गणितज्ञास त्याच्या उल्लेखनीय संशोधनासाठी ‘श्रीनिवास रामानुजन’ पारितोषिक देण्यात येते.
आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले आणि भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली.
गणित वर्ष 2012 साजरे करण्याचे उद्देश त्यांच्या कार्याची आठवण करत नवीन संशोधकांची पिढी तयार करणे, गणिताकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करणे तसेच जनसामान्यांपर्यंत गणिताची महती पोहचवणे असे आहे. त्या दृष्टीने गणिताबाबत विविध स्तरांवर कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रे, स्पर्धा व प्रकाशने आणि गणितातील करिअर्सच्या संधीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे असे कार्यक्रम हाती घ्यावेत अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2012 हे ‘ट्युरिंग वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. अँलन ट्युरिंग (1912-1954) हे इंग्लंड मधील मूळचे गणितज्ञ, पण संगणक क्षेत्रात त्यांनी केलेले पायाभूत काम आजही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वर्षी अनेक कार्यक्रम जगभर आखले आहेत.
गणितातील संकल्पना व पद्धती उपलब्ध असल्यामुळेच अनेक क्षेत्रांत प्रगती होते, म्हणून गणितात सातत्याने संशोधन करून ज्ञानात भर घालणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण सर्व या ‘2012 गणित वर्षा’त गणिताचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रबोधन यांची नवी दालने उघडण्याचा संकल्प करूया.
4000 सूत्रांची मांडणी
केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास 4000 सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत…आंतरराष्ट्रीय स्तरावर 2012 हे ‘ट्युरिंग वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. अँलन ट्युरिंग (1912-1954) हे इंग्लंड मधील मूळचे गणितज्ञ, पण संगणक क्षेत्रात त्यांनी केलेले पायाभूत काम आजही मार्गदर्शक ठरत आहे.
गणितात अशी संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जातो. अशी कोणतीही संख्या नाही असेच बहुतांश जणांचे म्हणणे होते. पण हा एक आकडा खूपच विचित्र आहे आणि जगातील सर्व गणितज्ञांना धक्का बसला आहे.
ही संख्या भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अविचल बुद्धिमत्तेने शोधून काढली.
ही संख्या २५२० पहा.
ही अनेक संख्यांपैकी एक असल्याचे दिसते,…. तथापि, प्रत्यक्षात तसे नाही,
२५२० ही अशी संख्या आहे, ज्याने जगभरातील अनेक गणितज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.
२५२० या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने नि:शेष भाग जातो.
सम किंवा विषम:
हे खरोखर आश्चर्यकारक आणि अशक्य असल्यासारखे वाटते.
आता, खालील तक्ता पहा;
२५२० ÷ १ = २५२०
२५२० ÷ २ = १२६०
२५२० ÷ ३ = ८४०
२५२० ÷ ४ = ६३०
२५२० ÷ ५ = ५०४
२५२० ÷ ६ = ४२०
२५२० ÷ ७ = ३६०
२५२० ÷ ८ = ३१५
२५२० ÷ ९ = २८०
२५२० ÷ १० = २५२
२५२० या संख्येचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] च्या गुणाकारात लपलेले आहे.
भारतीय हिंदू वर्षाच्या संदर्भात, या २५२० क्रमांकाचे कोडे सोडवले आहे.
हे या संख्येचे गुणांक आहेत.
आठवड्याचे दिवस (७),
महिन्याचे दिवस (३०)
आणि वर्षातील महिने (१२)
[ ७ × ३० × १२ = २५२० ] हे काळाचे वैशिष्ट्य आणि प्रभुत्व आहे.
महान गणिती ज्याने ते शोधले होते ते होते श्री श्रीनिवास रामानुजम अय्यंगार.
भारत सरकारच्या एन सी आर टी (NCRT)आणि एन सी एस एम (NCSM)यांच्या संयुक्त विद्यमाने, सर्वात मोठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा , म्हणजेच 'विध्यार्थी विज्ञान मंथन', विज्ञान भारती तर्फे दरवर्षी एका दिवसाच्या नियोजनाची असते. ही परीक्षा प्रथमच परभणीत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी , परभणी यांच्या सहकार्याने , परभणी येथे दोन दिवसाची , दिनांक 16 व 17 डिसेंबर ला संपन्न झाली.
या परीक्षेसाठी वीस जिल्ह्यातील म्हणजेच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र प्रांत यातील 130 विद्यार्थीची निवड झाली होती, निवड झाल्या पैकी 113 विध्यार्थी परीक्षेसाठी हजर होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमा दरम्यान दिनांक 16 डिसेंबर रोजी संबंधित निवड झालेली विद्यार्थी व त्यांचे पालक यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले विविध विभागात जसे की उती संशोधन केंद्र, रेशम संशोधन केंद्र, हवामान प्रयोगशाळा तसेच नाहेप प्रकल्पा अंर्तगत असलेला रोबोट विभाग दाखवून त्यासंदर्भात सविस्तर माहिती व त्या विभागाला भेट देण्यात आली व तेथील तज्ञ डॉ. आनंद दौंडे, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. गोपाळ शिंदे व डॉ. आनंतलाड यांचे मार्गदर्शन मिळाले.
तसेच पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणीत या महाविद्यालयाला भेट देऊन त्यामधील शरीरचनाशास्त्र विभाग, विकृतीशास्त्र विभाग, परोपजीवीशास्त्र विभाग व शल्य चिकित्सा विभाग यांना भेट देऊन तेथे असलेल्या तज्ञ डॉ. चंद्रकांत मामडे, डॉ. गोविंद गंगने, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. बापूराव खिल्लारे, डॉ. शरद चेपटे मार्गदर्शन मिळाले.
आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाला विद्यार्थ्यां पालकांची भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुललाच्या "विद्यार्थी विज्ञान मंथन" परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भेट देऊन विज्ञान संकल्प पाहून विद्यार्थी भारावून गेलीत भविष्यात होऊ घातलेल्या या विज्ञान संकल्पनाची वाटचाल ही विज्ञान क्षेत्रातील अतिशय प्रभावशाली , प्रेरणादायी असेल आणि परभणीचे नाव हे देशभर गौरवित करणार आहे. असे मत विद्यार्थी आणि पालकांनी त्या ठिकाणी मांडली.
दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता परीक्षेचा उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ उदय खोडके, व प्रमुख पाहुणे म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल हे उपस्थित होते. विशेष निमंत्रित म्हणून श्री ओम प्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जि प परभणी, डॉ पी .आर. पाटील जि प परभणी , डॉ. पराग नेमाडे आय सी टी जालना, व श्री श्यामजी बाराडकर हे होते.
ही परीक्षा सकाळी ठीक नऊ वाजता सुरू झाली या परीक्षा घेण्यासाठी रसायनशास्त्र , भौतिकशास्त्र, जीवशास्त्र , व गणित विभागातर्फे परीक्षार्थी साठी परभणीतील विविध महाविद्यालयातील निष्णात असे प्राध्यापक व शिक्षक तसेच स्व्यमसेवक लाभले.
प्रा. विष्णू नावपुते , प्रा सतीश मुंदे , प्रा.अरुण भांगे, प्रा. काशिनाथ सालमोटे, प्रा. तुळशिराम दळवे , प्रा. विशाल डाके, प्रा.मोहन गडेकर, प्रा सुषमा सोळुंके, प्रा.विना सदावर्ते, प्रा माकू पर्शिया, प्रा. दत्तात्रेय भड, प्रा. नितीनकुमार पारवे, प्रा. वैभव राऊत, प्रा.शिवाजी पारवे, प्रा. संभाजी सवंडकर प्रा. शंकर ठोंबरे, प्रा. संजय ढवळे, प्रा. आशा रेंगे, प्रा जे. यु. पाटील, प्रा. संतोषी झरकर , प्रा. डी. एन. ढवळे , प्रा. प्रताप भोसले व श्री प्रसार वाघमारे यांनी परिश्रम घेतले .
तसेच या परीक्षेसाठी विज्ञान भारती ( विभा) विद्यार्थी विज्ञान मंथन चे देवगिरी प्रांत समन्वयक श्रीपाद कुलकर्णी आणि अमोल कुंबळकर, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत समन्वयक
मीना माळगावकर आणि वैशाली कामत , आणि देवगिरी प्रांत संयोजक डॉ .नितीन अधापुरे, व महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ.मानसी मालगावकर, पश्चिम देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य मा. राहुल पाठक, मा. अनिल संवत्सर, मा. अवधूत देशमुख , त्याच बरोबर , विभाचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य श्री श्याम बारडकर समन्वयक म्हणून लाभले.
या सर्व जणांनी अथक परिश्रम घेऊन पूर्ण लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पार पाडून निकाल लावला. त्यातून इयत्ता 6 वी ते 11 वी मधून प्रति वर्गातून 3 या प्रमाणे एकूण 18 विद्यार्थ्यांची निवड केली. त्यामध्ये इयत्ता सहावीतून सर्वेश चांडक, आरुष पगार व अथर्व चौबे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता सातवीतून आयुष पाटील, अन्हाद अहुजा व अमोल पाटील हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता आठवीवीतून श्रीजित मित्रा, अनुपम नजन व अद्वैत राममोहन हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता नववीतून अमृत वर्षिनी, सिद्धांत कावरे व मानस मगर हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता दहावीतून चार्वी कोठारी, समान पांडे व ओम हरकल हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले तर इयत्ता अकरावी मधून रोहन पुणेकर, अर्णव जोगळेकर आणि सर्वेश पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय क्रमांक पटकाविले. वरील सर्व विद्यार्थामघून प्रत्येक इयतेतून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यींची राष्ट्रीय पातळी वरील परीक्षेसाठी निवड झाली आहे.
सदर परीक्षा चालू असताना पालकांसाठी व ईतर विद्यार्थ्यांसाठी, भाभा अणु ऊर्जा प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ जयंत जोशी यानी भौतिकशास्त्रातील विविध प्रयोग सहजपणे करून दाखवले व त्यांचे महत्त्व विषद करून सांगितले . मुलांना प्रयोग करून दाखविले व करून घेतले .मुलांसाठी ही रोमांचक ठरले. तसेच , डॉ अनिल खरात यांनी संमोहनशास्त्रा बद्दल असणारे समज व गैरसमज याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
सक्सेस ॲप बालनाट्यने जिंकली रसिकांची मने
नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी (नृ.) च्या वतीने लेखक दिग्दर्शक त्र्यंबक वडसकर यांनी केलेले बाल नाट्य सक्सेस ॲप हे सादर केले. आत्मविश्वास हाच खरा सक्सेस ॲप आहे ही टॅगलाईन घेऊन हे बालनाट्य होते. तथागत गौतम बुद्धाने प्रतिपादित केलेले “अतः दीप भव” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतःचा प्रकाश स्वतः झाला पाहिजे हे प्रभावी मांडण्याचा यशस्वी प्रयत्न या नाटकातून केला आहे.
या नाटकात पुजा गमे, प्रांजली वाघ, संध्या जवंजाळ,शुभांगी पांचाळ, प्रिती पांचाळ धनश्री एडके, वैष्णवी कदम, वेदिका मुळे, अंजली वाळके, पुनम आव्हाड, अंजली वाघ , वेदिका तसनुसे, ऋतुजा वाघ, निकिता सातपुते यांचा समावेश होता , निर्मिती प्रमुख प्राचार्य पी.बी.शेळके नेपथ्य शैलेष ढगे , प्रकाश योजना लक्ष्मीकांत जोगेवार,विरेन दामूके तर संगीत प्रा. संजय गजमल यांचे होते रंगभूषा राखी मुळे यांची होती.
ब्रम्हामांडाची सफर प्रसिद्ध खगोलतज्ञ श्री हेमंतजी धानोरकर यांनी उपस्थितांना टेलीफिल्म च्या माध्यमातून आपल्या ओघवत्या वाणीमधून ब्रम्हामांडाची माहिती करून दिली .
रिसर्च ॲज करियर संशोधन हे करिअर याबददल मा डॉ रंजन गर्गे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले .
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे खगोलशास्त्रातील विविध शंकांचे निरसन करत, नेहरू तारांगणाचे संचालक श्री अरविंद परांजपे यांनी त्यांचाशी संवाद साधला.
या दोन दिवशीय कार्यक्रमाचा समारोप समारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे कुलगुरू डॉक्टर प्रा इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान याप्रसंगी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर धर्मराज गोखले संचालक विस्तार शिक्षण , श्री. श्याम बारडकर ,सौ .डॉ. समप्रिया पाटील व डॉ. रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील कार्यक्रमसंपन्न झाला. दिवसभरातील समारंभा कार्यक्रमाचे संचलन श्री नितीन लोहट , श्री दीपक शिंदे , डॉ. विजयकिरण नरवाडे , डॉ बाहुबली लिंबाळकर यांनी केले तर तसेच कार्यक्रमाचे आभार श्री नितीन आधापुरे ,कैलाश सुरवसे, महेश शेवाळकर यांनी मानले.
परीक्षा यशस्वी करण्यासाठी परभणीतील व्यवस्थापनात समाजप्रिय श्री संदीप देशमुख, श्री वाकोडकर, श्री महेश काकंरिया, श्री सचिन तोष्णीवाल, श्री राजन मानकेश्वर , श्री संतोषी देवडे श्री नितिन लोहट ,श्री मिलिंद मोताफळे, सौ अंजली बाबर, श्री पठाण सर , डॉ. अंकित मंत्री , डॉ. माऊली हरबक श्री रामभाऊ रेंगे, श्री दीपक देशमुख , श्री उपेंद्र फडणीस , श्री विनोद मुलगिर, डॉ. बालाजी कोंडरे, श्री दत्ता बनसोडे, श्री सनद जैन ,श्री ओम तलरेजा ,v श्री गणेश माऊली खंटीग, श्री भगवानदादा खंटीग, श्री प्रकाश केंद्रेकर, श्री सुभाष जाधव, श्री कल्याण भरोसे , श्री राजपाल देशमुख , श्री माजेद ,श्री अखिल अन्सारी, श्री भागवत नाईक यांच्या बहुमोल योगदानामुळे यांच्या बहुमोल सहकार्यामुळे, आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य यांनी परिश्रम घेऊन राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मंथन प्रज्ञाशोध परीक्षा 2024 यशस्वीरित्या संपन्न केली
शिकारी ते बर्डमॅन : सलीम अलींचा जीवनप्रवास : भारताचे पक्षीपुरुष.
डॉ.सलिम अली म्हणजे आयुष्यभर एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. त्यांनी स्वत:चे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण केले. समाजमन त्यासाठी अनुकूल बनवले आणि मग त्यामध्ये आपले कार्य आणि संशोधन झिरपू दिले. ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणजे भारताचे ‘पक्षिपुरुष’ म्हणूनही आज संपूर्ण जगाला त्यांची ओळख असली आणि त्यांच्या शास्त्रीय कार्याला जागतिक स्तरावरची मान्यता लाभली असली, तरी त्यापेक्षाही काकणभर सरस असणारे त्यांचे कार्य म्हणजे भारताला त्यांनी दिलेली निसर्ग संरक्षण आणि सुस्थापन चळवळीची देणगी.
त्यांचा जन्म सुलेमानी मुस्ता अली इस्माइली कुटुंबात झाला. नऊ भावंडांमध्ये ते सर्वांत शेवटचे होते. आईवडिलांचे छत्र लवकर हरपल्यामुळे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांचे पालनपोषण त्यांच्या मामांच्या, अमिरुद्दीन तय्यबजी यांच्या, गिरगावातल्या खेतवाडीमधील घरी झाले. मामांकडे निरनिराळ्या प्रकारची अनेक हत्यारे आणि बंदुका होत्या. ते शिकारी होते. लहानपणी सलिमनी गंमत म्हणून आणि खाण्यासाठी म्हणून अनेक चिमण्यांची शिकार केली होती. एकदा त्यांनी गळ्यावर पांढरा ठिपका असलेली चिमणी मारली.
परंतु धार्मिक घरामध्ये ती खाण्यायोग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मामांनी त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे (बी.एन.एच.एस.) अभिरक्षक डब्ल्यू.एस. मिलार्ड यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्या पक्ष्याची ओळख करून देण्याबरोबर सलिमला सोसायटीतील पेंढा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह फिरवून दाखविला. पक्षिसृष्टीचे दार त्यामुळे उघडले जाऊन सलिम अलींना पक्षीविषयक अभ्यास गांभीर्याने स्वीकारणे शक्य झाले. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता.
शालेय जीवनात सलिम अलींनी फारशी चमक दाखविली नाही. त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात विशेष रुची नव्हती. परंतु खेळांमध्ये गोडी होती. घरामध्ये निसर्गविषयक माहिती आणि त्या संदर्भातील साधनांची रेलचेल होती म्हणून त्याची परिणती सलिम अलींच्या मनात पक्षिशास्त्रज्ञ होण्याचा विचार रुजण्यात आणि तो फोफावण्यात झाली. १९१३ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी प्राणिशास्त्र विषयात पदवी घेण्याच्या दृष्टीने सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे प्रवेश घेतला. परंतु लॉगॅरिथम्स आणि तत्सम अवघड गोष्टींमुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले आणि ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) तेव्हायला प्रयाण केले. तेथे त्यांचे बंधू जाबिर अली खाणधंद्यामध्ये होते. भावाला मदत करण्याबरोबर आजूबाजूला असलेल्या वनप्रदेशात त्यांची भ्रमंती सुरू झाली. त्यातूनच त्यांची निसर्गशास्त्रज्ञ होण्याची कौशल्ये वाढीस लागली.
१९१७ साली भारतात परतल्यावर त्यांनी प्राणिशास्त्रविषयक एक वर्षाचा अनौपचारिक शिक्षणाचा अभ्यासक्रम छंद म्हणून पूर्ण केला. फावल्या वेळात ते बी.एन.एच.एस.मध्ये जात. तेथे त्यांना भारतीय पक्षिसृष्टीचा परिचय झाला. तेथे त्यांची प्रेटर यांच्याशी गट्टी जमली. त्यांच्याबरोबर त्यांनी पक्षी जगतात बरीच मुशाफिरी केली. १९१८ साली त्यांनी तेहमिना नावाच्या आपल्या दूरच्या नात्यातील मुलीशी विवाह केला. लगेच ते दोघे तेव्हायला परत गेले. सलिम अलींना खाण धंद्यापेक्षा पक्ष्यांतच रस होता. त्यामुळे आधीच डबघाईला आलेला धंदा पूर्णपणे बसला आणि १९२४ साली अली बंधू भारतात परतले.
पक्षिजीवनाविषयीचे प्रशिक्षण घेण्याकरिता त्यांनी ठिकठिकाणी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांना बर्लिन विद्यापीठाच्या प्राणिसंग्रहालयाने प्रतिसाद दिला. प्रा. एरविन स्टेसमन यांच्या हाताखाली त्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेतले. अर्थात त्यासाठी त्यांना तत्कालीन वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी असलेल्या पक्षिशास्त्रज्ञांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. बर्लिनमधील सात महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पायांत कडी चढविण्याच्या उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन कार्यानुभव घेतला.
१९३० साली भारतामध्ये पुन्हा एकदा नोकरीचा शोध सुरू झाला. योग्य नोकरी न मिळाल्यामुळे सलिम अली आणि तेहमिना यांनी अलिबागजवळच्या किहीम या किनारपट्टीवरील गावात मुक्काम हालवला. तेथेच त्यांनी आपला सारा वेळ पक्ष्यांचा मागोवा घेण्यातच घालवला. बाया सुगरण पक्ष्यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. अशा प्रकारे बाया सुगरण पक्ष्यांचे दीर्घकाळ निरीक्षण करणारे ते पहिलेच होते. त्यांचा अभ्यास प्रामुख्याने त्यांच्या वर्तवणूकीविषयी होता. आजवर कोणी, कुठेच न नोंदवलेले जीवननाट्य त्यांनी प्रत्यक्ष बघितले.
बाया नरपक्षी मादीबरोबर मिलन करण्याच्या हेतूने तिला आकर्षित करण्याकरिता शिंदीच्या झाडांवर घरटी विणतात. एका विशिष्ट टप्प्यावर ते घरट्याचे विणकाम थांबवतात. मादी त्याचे निरीक्षण करते. आंतररचना तपासते. घरटे पसंत न पडल्यास पुन्हा नवे घरटे उभारण्यास नराद्वारे सुरुवात केली जाते. पुन्हा तीच प्रक्रिया पार पडते. घरट्यास पसंती लाभल्यास त्याच घरट्यात लगेच मिलन उरकून पसंतीची खातरजमा होते. मग तो नशीबवान नर घरट्याची उर्वरित बांधणी पूर्ण करतो. त्यामध्ये मादी अंडी घालते, उबवते. घरटी सजीव होतात. नर मात्र एक घरटे बांधून पूर्ण होताच दुसरे घरटे बांधायला घेतो आणि नव्या घरोब्याच्या तयारीला लागतो. याच क्रमाने, एकाच हंगामात किमान तीन-चार माद्यांचा तो दादला होतो. पक्षीविषयक पुस्तकातून आजवर कोणीही न नोंदवलेला हा जीवनपट डॉ.सलिम अलींनी सोसायटीच्या जर्नलमध्ये एक प्रदीर्घ लेख लिहून प्रकाशित केला.
सलिम अलींच्या या मूळ अभ्यासावरच या पक्ष्यांच्या संदर्भात पुढील अध्ययन झाले. प्रत्यक्ष अवलोकन करून खातरजमा झाल्यावरच शास्त्रशुद्ध पद्धतीने निष्कर्षाची मांडणी करण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. भारतीय पक्ष्यांचा मागोवा घेऊन त्याचे सूचीकरण केले. भारतीय पक्षिशास्त्राची उभारणी शास्त्रशुद्ध पायावर केली.
त्यांचे पक्षी-सर्वेक्षणाचे अहवाल वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरले. आजवर विचारात न घेतलेल्या पर्यावरण, परिसंस्था, भौगोलिक घटकांचा विचारही त्यात होता. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पक्ष्यांच्या परिसंस्थेचा परिस्थितीच्या दृष्टीने अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. बंगळुरूहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात, १९६३ साली ‘इकनॉमिक ऑर्निथॉलॉजी इन इंडिया’ या शोधनिबंधातून त्यांनी पक्षी-अभ्यासाचे शेती आणि जंगलांच्या संदर्भातील महत्त्व पटवून दिले. देशातील अन्नधान्य वाढविण्याच्या मोहिमेत पक्ष्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या खाद्यसवयींचा विचार व्हायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहामुळे, जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे नंतरच्या काळात अनेक भारतीय कृषिविद्यापीठांनी अभ्यासक्रम आखले, उपक्रम सुरू केले. पारिस्थितिकी किंवा इकलॉजीचे आद्य तज्ज्ञ म्हणून डॉ. सलिम अली यांना मान द्यायला हवा.
पक्ष्यांचे वर्तन अभ्यासण्याकरिता त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यासही फार पूर्वीपासूनच सुरू केला होता. त्या दृष्टीने ‘केवलादेव घना’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते. भरतपूरजवळील या पाणथळ प्रदेशात दरवर्षी करकोचे, बगळे, पाणकावळे, हविर्मुख (चमचे), क्रौंच इत्यादी पाणपक्ष्यांच्या विणीचा हंगाम साधून डॉ.सलिम अलींनी आपल्या सहकाऱ्यांच्या आणि नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या मदतीने लाखो पक्ष्यांना कडी चढवली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्षी जीवनात कोणते बदल घडून येतात, हे स्थलांतरित पक्षी कुठे कुठे विखुरतात, स्थानिक नि स्थलांतरित यांत संघर्ष होतो का, स्पर्धा असते का, मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या परंपरागत जीवनात कोणता विक्षेप येतो, या आणि अशा दृष्टिकोनातून सालिम अलींनी अनेक अभ्यासप्रकल्पांची उभारणी केली. निरीक्षणातून पक्षिशास्त्र अभ्यासण्याला चालना मिळाल्यावर अनेक तरुण त्याकडे वळले. सलिम अलींच्या प्रयत्नांमुळे भारतभर अनेक ठिकाणी पक्षी-अभयारण्ये घोषित झाली.
पक्षी-स्थलांतरणाचा त्यांचा अभ्यास एवढा गाढा होता, की जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच.ओ.) पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या बाबतीत प्रश्नांची उकल करण्याकरिता सलिम अलींना पाचारीत असे. त्यांचे पक्षिप्रेम, प्राणिमात्राविषयीची आस्था ही केवळ भाबड्या भूतदयेपोटी नव्हती. मात्र निरनिराळ्या प्रकल्प उभारणीपायी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने, परिसंस्था नष्ट होऊ लागल्यामुळे आणि अनेक पक्षिजाती नामशेष होऊ लागल्यामुळे त्यांना अतीव दु:ख होत असे. नुसते कायदे करून भागणार नाही, जनजागृती होणे महत्त्वाचे आहे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी व्याख्याने, फिल्म्स, स्लाइड्सद्वारा वन्यप्राण्यांचे महत्त्व पटवून देण्याचे त्यांनी सतत प्रयत्न केले.
सायलेंट व्हॅली संरक्षणाच्या आंदोलनात त्यांच्या प्रयत्नांना १९७७-१९७८ सालांत निसर्गप्रेमी जनतेने खंबीर आणि ठाम पाठिंबा दिला. यावरून लोकमानसात त्यांचा पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा रुजण्याची पावती मिळते. पशुपक्षी राखायचे म्हणून तिथून माणसाला बाहेर हुसकायचे, अशा विचारांचा पाठपुरावा ते करत नव्हते.माणूस आणि निसर्ग यांत सुसंवाद आणि परस्परपूरकता राखण्याच्या तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. अशा विचारांना प्राधान्य देणाऱ्या ‘सह्याद्री बचाव’, ‘मुंबई बचाव’ चळवळींना त्यांचा पूर्ण पाठिंबा होता.
भारतीय पक्षिशास्त्राचा अभ्यास खंडित होऊ न देता, तो पुढे चालू ठेवण्याची, त्याची प्रतिष्ठा वाढविण्याची आणि त्याला लोकमान्यता, लोकप्रियता मिळवून देण्याची कामगिरी सलिम अलींनी निष्ठापूर्वक पार पाडली. पक्षिशास्त्रात सतत नवीन भर टाकली. त्यांच्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे भारतात ठिकठिकाणी निसर्ग अभ्यास मंडळे, पक्षी निरीक्षण मंडळे, वृक्षमित्र संघटना उभ्या राहिल्या. सायलेंट व्हॅलीसारख्या घटना पुन्हा-पुन्हा घडू नयेत, त्यावर काही नियंत्रण असावे, लोकमताचा दबाव असावा, शास्त्रीय ज्ञानाचा अंकुश असावा, या दृष्टीने कायमस्वरूपाची एखादी योजना असावी यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे, पर्यावरण खाते निर्माण करावे असा आग्रह धरला. इंदिरा गांधींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन वन आणि पर्यावरण खात्याची निर्मिती १९८१ साली केली.
१९४७ साली बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यापासून तर ते सोसायटीचे अविभाज्य अंगच बनले. संस्थेच्या नियतकालिकाचेही ते संपादन करीत. कोणत्याही कामाबद्दल वेतन वा मानधन न घेता, त्यांनी तिचा कारभार सांभाळला. तिचे कार्यक्षेत्र वाढवले. उत्तरायुष्यात मिळालेल्या नाना पुरस्कारांचे मानधनही त्यांनी सोसायटीच्या उत्कर्षासाठी वेचले. त्यांच्या अविरत प्रयत्नांमधूनच मुंबई विद्यापीठाने १९५७ साली सोसायटीला एम.एस्सी. आणि डॉक्टरेटचा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली.
शास्त्रज्ञ, संशोधक, कार्यकर्ता या आपल्या ओळखीबरोबरच डॉ. सालिम अली प्रसिद्ध आहेत, आपल्या निसर्गविषयक विशेषत: आपल्या पक्षीविषयक लेखनासाठी, पुस्तकांसाठी. त्यांचे आत्मचरित्र ‘द फॉल ऑफ द स्पॅरो’ १९८५ साली प्रकाशित झाले आणि गाजले. परंतु त्यापूर्वीही त्यांनी अनेक पुस्तके, तांत्रिक अहवाल लिहिले होते. त्यांच्या पुस्तकांचा वापर संदर्भग्रंथ म्हणून केला जातो. त्यांनी पक्षी-सर्वेक्षणावर आधारित ‘बर्ड्स ऑफ कच्छ’, ‘इंडियन हिल बर्डस’, ‘द बर्ड्स ऑफ त्रावणकोर’- कोचिन, ‘पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडिया अॅन्ड सब कॉन्टिनेन्ट’ इत्यादी पुस्तके लिहिली. भारतीय पक्षिशास्त्रात सर्वांत मोलाची भर घातली ती त्यांच्या ‘हॅण्ड बुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अॅन्ड पाकिस्तान’ या दशखंडात्मक ग्रंथराजाने.
डॉ. सलिम अलींच्या निसर्गविषयक ज्ञानाची, अभ्यासाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निसर्गसंरक्षण, वन्यप्राणी संरक्षण समित्यांचे ते सदस्य होते. १९७६ साली त्यांना ‘नोबेल’ पारितोषिकाच्या तोडीचे ‘जे. पॉल गेट्टी’ पारितोषिक लाभले. त्याशिवाय त्यांना १९५८ साली ‘पद्मभूषण’ आणि १९७६ साली ‘पद्मविभूषण’ हे भारत सरकारचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९६७ साली ‘ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट्स युनियन’चे ‘सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. डच सरकारने ‘कमांडर ऑफ द नेदरलॅण्ड्स ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क’ देऊन गौरवान्वित केले. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९८२ साली ‘नॅशनल रिसर्च प्रोफेसरशिप इन ऑर्निथॉलॉजी’साठी त्यांची भारत सरकारने निवड केली. तीन मानद डॉक्टरेट मिळालेले डॉ. सलिम अली १९८५ साली राज्यसभेवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले. १९८७ साली त्यांना निसर्ग आणि वन्यप्राणी यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल ‘दादाभाई नवरोजी पारितोषिक’ देण्यात आले.
१९८७ साली, ९१ वर्षांचे असताना, प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने मृत्यूने गाठेपर्यंत ते सतत कार्यमग्न राहिले.
संकलन - डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट