डॉ. गोविंद स्वरूप यांचा जन्म ठाकूरद्वार, उत्तर प्रदेश, येथे 23मार्च 1929 झाला. यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाते.
डॉ. गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स (MSc) पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली.
कारकीर्द. डॉ. गोविंद स्वरूप यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत १९५०-५३ आणि १९५५-५६ या काळात काम केले तसेच CSIRO ऑस्ट्रेलिया येथे १९५३-५५ या काळात काम केले. त्यांनी १९५६-५७ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले तर १९५७-६० या काळात स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९६१-६३ या काळात स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.
सिडनी जवळील पॉट्स हिल येथे ६ फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (parabolic) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद – नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.
पुरस्कार
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७२) पद्मश्री (१९७३) पी.सी. महालनोबीस पदक (१९८४) मेघनाद साहा पदक (१९८७) होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार (२००९)
७ सप्टेंबर २०२०, पुणे येथे अल्पशा अजाराणे निधन झाले…
इतिहास प्राचीन भारतीय विज्ञानाचा या सत्रात आपले पुनश्च स्वागत🙏🏻🙏🏻🙏🏻
आज आपण जाणून घेणार आहोत चोकोणाचे वर्तुळ करणारा कल्पक भूमिती तज्ञ…….. बौधायन यांच्या विषयी. ख्रिस्ती पूर्व पाचवे ते तिसरे शतक असावे,प्राचीन भारतीयांचा ज्ञानयज्ञ हा जग व्यापून राहिला होता. त्यातूनच जगाला मिळालेले पायस म्हणजे गणित विषय, त्यातला एक महत्त्वाचा यज्ञकरता म्हणजे प्राचीन भारतीय भूमिती तज्ञ बौधायन होय.
भूमितीतील रचना कूट प्रश्न आणि त्याची उत्तरे, चौकोनाचे तेच क्षेत्रफळ असलेल्या समांतर समद्विभुज चौकोनात रूपांतर कसे करायचे,दोन काटकोन समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकेच क्षेत्रफळ असणारा काटकोन समभुज चौकोन कसा काढायचा, दोन काटकोन समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या फरका इतके क्षेत्रफळ असलेला काटकोन समभुज चौकोन काढणे,चौकोनाचे त्याच्या इतके क्षेत्रफळ असलेला समभुज चौकोन काढणे,काटकोन समभुज चौकोनाचे तितक्याच क्षेत्रफळाच्या वर्तुळात परिवर्तन करणे,असे अनेक भूमिती सिद्धांत त्यांनी मांडले व सिद्ध केले. बौधायनांच्या सूत्रग्रंथांमध्ये पुढील ६ ग्रंथांचा समावेश होतो :
१) बौधायन श्रौतसूत्र
२) बौधायन कर्मान्तसूत्र
३) बौधायन द्वैधसूत्र
४) बौधायन गृह्यसूत्र
५) बौधायन धर्मसूत्र
६) बौधायन शुल्बसूत्र
बौधायन शुल्बसूत्रांमध्ये आधुनिक भूमितीमधील काही प्रमेये समाविष्ट आहेत.
बौधायन प्रमेय/ पायथॅगोरसचे प्रमेय :
आज आधुनिक भूमितीमध्ये जे प्रमेय पायथॅगोरसचे प्रमेय म्हणून ओळखले जाते ते बौधायनांनी पायथॅगोरसच्या आधी कित्येक वर्षे आपल्या ग्रंथामध्ये श्लोकस्वरूपात लिहिलेले आहे.
अर्थात त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्रिकोणाच्या कर्णाच्या वर्गाएवढी असते.
२ चेवर्गमूळ :
आज ज्या संख्यांना गणितात करणी संख्या म्हटले जाते त्या संख्यांची किंमत काढण्याची पद्धत देखील बौधायनांनी आपल्या ग्रंथात नमूद करून ठेवली आहे.
समस्य द्विकर्णि प्रमाणं तृतीयेन वर्धयेत।
तच् चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन सविशेषः।।
या पद्धतीने २ चेवर्गमूळ काढल्यास ते पाच दशांश स्थळांपर्यंत अचूक येते.
√२ = १ + १/३ + १/(३x४) – (१)/(३x४x३४) = ५७७/४०८ = १.४१४२१६ निरनिराळ्या आकाराच्या यज्ञविधी बांधण्यास भूमितीय रचना पद्धतीचा शोध त्यांनी लावला… तत्कालीन राजाकडून त्यांना भूमिती तज्ञ म्हणून गौरविण्यात आले होते…..
मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन यांचं जन्म २८ ऑगस्ट, इ.स. १९२८ मध्ये मंगळूरु, कर्नाटक येथे झाला.हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत.मेनन जी यांनी 1946 मध्ये ‘जसवंत कॉलेज’, जोधपूर , भारत येथून विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले . यानंतर ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, एम.एस्सी. 1949 मध्ये पीएच.डी आणि नंतर 1955 मध्ये ‘पोस्ट डॉक्टरल रिसर्च’ केले.
त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करून मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले.होमी भाभा यांच्या आग्रहास्तव 1955 मध्ये ते टाटा वेळी ही मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोरहून मुंबई हलवली होती. 1966 मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जेआरडी टाटांनी नेमणूक केली. त्यावेळी ते ३८ वर्षाचे होते. 1975 पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. या संस्थेत असतानाच थोर संशोधक सी. व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडली. दोन दशकाहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मिती महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1972 मध्ये नऊ महिने काम केले. 1974 मध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1974 ते 1978 या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि 1980 मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी नियुक्त करण्यात आली.
त्यांना 1961 मध्ये पद्मश्री, 1968 मध्ये पद्मभूषण, 1985 मध्ये पद्मविभूषण हे तिने पद्म पुरस्कार प्राप्त झाले. १९६०चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. विज्ञान मुत्सद्दी एम.जी.के मेनन यांचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले.
भारतीय अणुवैज्ञानिक व रासायनिक अभियंते. भारताने पोखरण येथे १९७४ मध्ये अणुचाचणी घेतली तेव्हा सेठना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. भारताच्या शांततामय अणुऊर्जा कार्यक्रमामधील आणि अणुऊर्जा संयंत्रे (उदा., अणुभट्ट्या) उभारण्याच्या कार्यातील सेठना हे प्रमुख व महत्त्वाचे वैज्ञानिक होते.
होमी नुसेरवानजी सेठना यांचा जन्म मुंबईला एका सधन पारशी कुटुंबात झाला. मेहरबाई व नुसेरवानजी ही त्यांच्या आईवडिलांची नावे होत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. व बी.बी.एस्सी. (टेक) या पदव्या संपादन केल्या. नंतर त्यांनी अमेरिकेतील ॲन आरबोर येथील मिशिगन विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची एम्.एस्सी. पदवी मिळविली (१९४६). त्यानंतर काही काळ त्यांनी इंग्लंडमध्ये इंपीरियल केमिकल इंडस्ट्री या कंपनीत नोकरी झालेल्या अणुसंशोधन विभागात वैज्ञानिक म्हणून काम करू लागले.
केरळमधील अल्वाये येथे मोनॅझाइट वाळूतून विरल मृत्तिका नावाने ओळखण्यात येणारी धातुरूप मूलद्रव्ये अलग करण्यासाठी थोरियम (धातू) निष्कर्षण संयंत्र उभारण्यात आले. या उभारणीमध्ये सर्व तांत्रिक जबाबदारी सेठना यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तेथे दुर्मिळ (मुंबई) येथे प्लुटोनियम संयंत्र उभारण्याचा निर्णय भारताने घेतला. या संयंत्राचा पूर्ण अभिकल्प (आराखडा) भारतीय वैज्ञानिकांनी तयार केला होता तसेच हे संयंत्र उभारण्याचे सर्व काम भारतीय अभियंत्यांनी केले आणि होमी सेठना यांनी प्रकल्प अभियंता म्हणून या सर्व कामांवर देखरेख ठेवली होती. हा प्रकल्प १९६४ मध्ये सुरू झाला. त्याआधी १९५६–५८ दरम्यान ते कॅनडा–इंडिया रिॲक्टर या ४० मेवॉ. क्षमतेच्या अणुभट्टीचे प्रकल्प व्यवस्थापक होते. बिहारमधील जदुगुडा येथील युरेनियम मिल या संयंत्राची उभारणीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. येथे तयार होणारे शुद्ध युरेनियम भारतातील अणुभट्ट्यांत इंधन म्हणून वापरतात. १८ मे १९७४रोजी भारतात पोखरण येथे ‘प्रोजेक्ट स्माइलिंग बुद्धा’ ही अणुकेंद्रीय स्फोटाची पहिली शांततामय चाचणी घेतली. या चाचणीमागील मार्गदर्शक प्रेरणा सेठना यांची होती.
होमी भाभांच्या आकस्मिक निधनानंतर सेठना हे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक झाले व १९६६–७२ दरम्यान ते या पदावर होते. अणुऊर्जा विभागाशी निगडित सर्व विषयांवर संशोधन करणाऱ्या या केंद्राची या काळात चांगली भरभराट झाली.
१९७१ मध्ये विक्रम साराभाईंच्या आकस्मिक निधनानंतर अणुऊर्जा विभागाची पूर्ण जबाबदारी सेठनांकडे आली व १९८३ पर्यंत ते या पदावर होते. या काळात भारतातच तयार झालेल्या सहा अणुभट्ट्यांमध्ये वीजनिर्मिती सुरू झाली संरक्षण विभाग यांमध्ये समन्वय साधण्याचे काम सेठना यांनी जबाबदारीने व गोपनीयता बाळगून उत्तम रीतीने केले. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी या विभागाला सल्ला देऊन मार्गदर्शन केले.
सेठना यांनी अनेक देशी व विदेशी संस्था–संघटनांमध्ये विविध पदांवरही काम केले. १९५८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जिनीव्हा येथे ‘अणूचे शांततामय उपयोग’ या विषयावर परिषद घेतली होती व सेठना तिचे अध्यक्ष होते. औद्योगिक अणुऊर्जेसाठी असलेली वैज्ञानिक सल्लागार समिती, इंटरनॅशनल ॲटॉमिक एंजिनिअरिंग एजन्सी, केंद्रीय मंत्रिमंडळाची सायन्स ॲड्व्हायझरी कमिटी इत्यादींचे सेठना सदस्य होते. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, ⇨ इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया), इंडियन सायन्स काँग्रेस (१९७६), महाराष्ट्र ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (१९७६), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल एंजिनियर्स, रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (स्वीडन), आंध्र व्हॅली सप्लाय कं. लि. वगैरे संस्थांचे सेठना अध्यक्ष होते.
सेठना यांना पुढील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील मानसन्मान मिळाले होते :
पद्मश्री (१९५९), अभियांत्रिकीमधील शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६०),
पद्मभूषण (१९६६),
मिशिगन विद्यापीठाच्या (स्थापना १८१७) दीडशेव्या स्थापना दिनानिमित्तचा पुरस्कार (१९६७),
सर वॉल्टर पुसकी पुरस्कार (१९७१),
कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीचे सर विल्यम जेम्स मेमोरियल पदक (१९७४),
पद्मविभूषण व सर देवप्रसाद सरबंदीकर सुवर्णपदक (१९७५),
दुर्गाप्रसाद खैतान पदक (१९८३),
विश्व गुर्जरी पुरस्कार (१९८५),
पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८९)
यांशिवाय त्यांना भारतातील बारा विद्यापीठांनी आणि संस्थांनी डी. एस्सी. व डी. लिट्. यांसारख्या सन्माननीय पदव्या दिल्या आहेत. उदा., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची डी.एस्सी. (१९७३), मुंबई विद्यापीठाची एल्.एल्.डी. (१९७४), हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाची डॉक्टर इन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई) या संस्थेची डी.एस्सी. इत्यादी.
होमी सेठना यांचे मुंबई येथे ५ सप्टेंबर२०१० निधन झाले.
एन.आर. नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी भारताच्या दक्षिण-पश्चिम कर्नाटक राज्यातील सिडलघट्टा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये, कन्नड मध्ये झाला.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गेले आणि १९६७ मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. १९६९ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.मूर्ती यांनी प्रथम आयआयएम अहमदाबाद येथील एका विद्याशाखेच्या अंतर्गत संशोधन सहयोगी म्हणून आणि नंतर मुख्य प्रणाली प्रोग्रामर म्हणून काम केले. तेथे त्यांनी भारतातील प्रथम वेळ-सामायिकरण संगणक प्रणालीवर काम केले आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी बेसिक इंटरप्रिटरची रचना आणि अंमलबजावणी केली. त्यांनी सॉफ्ट्रोनिक्स नावाची कंपनी सुरू केली. दीड वर्षानंतर ती कंपनी अयशस्वी झाली तेव्हा ते पुण्यातील पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्समध्ये रुजू झाले.
मूर्ती यांनी उल्लेख केला की कम्युनिस्ट काळात १९७४ मध्ये युगोस्लाव्ह-बल्गेरियन सीमेदरम्यानच्या एका शहरामध्ये कोणत्याही कारणाशिवाय अटक आणि निष्कासित करण्यात आल्याने, त्याला “गोंधळलेल्या डाव्या/कम्युनिस्ट” मधून “दयाळू भांडवलदार” बनवले, ज्यामुळे त्याने इन्फोसिस तयार केले. मूर्ती आणि त्यांच्या सहा सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी १९८१ मध्ये सुरुवातीच्या भांडवली गुंतवणुकीसह १०,००० रुपये इन्फोसिसची स्थापना केली, जी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी प्रदान केली होती. मूर्ती हे १९८१ ते २००२ पर्यंत २१ वर्षे इन्फोसिसचे सीईओ होते आणि त्यांच्यानंतर सह-संस्थापक नंदन नीलेकणी होते. इन्फोसिसमध्ये त्यांनी भारतातून आयटी सेवा आउटसोर्सिंगसाठी जागतिक वितरण मॉडेल स्पष्ट केले, डिझाइन केले आणि अंमलात आणल. ऑगस्ट २०११ मध्ये, ते कंपनीतून निवृत्त झाले, आणि चेअरमन एमेरिटस हे पद स्वीकारले.
मूर्ती हे एचएसबीसीच्या कॉर्पोरेट बोर्डाचे स्वतंत्र संचालक आहेत आणि डीबीएस बँक, युनिलिव्हर, आयसीआयसीआय आणि एनडीटीव्हीच्या बोर्डवर ते संचालक आहेत. कॉर्नेल युनिव्हर्सिटी, फोर्ड फाऊंडेशन, यूएन फाऊंडेशन, इंडो-ब्रिटिश पार्टनरशिप, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अनेक शैक्षणिक आणि परोपकारी संस्थांच्या सल्लागार मंडळे आणि परिषदांचे ते सदस्य देखील आहेत. इन्फोसिस पारितोषिकाचे विश्वस्त, प्रिन्स्टनमधील प्रगत अभ्यास संस्थेचे विश्वस्त आणि रोड्स ट्रस्टचे विश्वस्त म्हणून. ते पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत. ते ब्रिटिश टेलिकम्युनिकेशन्सच्या आशिया पॅसिफिक सल्लागार मंडळावर आहेत.
जून २०१३ मध्ये, मूर्ती इन्फोसिसमध्ये कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक म्हणून परतले. जून २०१४ मध्ये, ते कार्यकारी अध्यक्षपदावरून दूर झाले, ऑक्टोबरपर्यंत ते गैर-कार्यकारी अध्यक्ष होते, जेव्हा ते चेअरमन एमेरिटस झाले. मूर्ती हे धोरणात्मक मंडळावर देखील आहेत जे राष्ट्रीय कायदा फर्म, सिरिल अमरचंद मंगलदास यांना धोरणात्मक, धोरण आणि प्रशासन विषयांवर सल्ला देतात. ते IESE च्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. २०१६ मध्ये, मूर्ती हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू असेंड सोबत “हाऊ टू बी अ बेटर मॅनेजर” या विषयावर बोलले. २०१७ मध्ये, मूर्ती यांनी इन्फोसिसमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली, तथापि कंपनीने हे दावे नाकारले.
त्यांची पत्नी, सुधा मूर्ती, एक उद्योगपती, शिक्षक, लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. मूर्ती यांना दोन मुले, एक मुलगा रोहन मूर्ती आणि एक मुलगी अक्षता मूर्ती आहे. जून २०१३ मध्ये, रोहन आपल्या वडिलांचा कार्यकारी सहाय्यक म्हणून इन्फोसिसमध्ये रुजू झाला. जून २०१४ मध्ये त्यांनी इन्फोसिस सोडले. २००९ मध्ये, अक्षताने ऋषी सुनक यांच्याशी लग्न केले, जे नंतर रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार आणि नंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनले.
पुस्तके ए बेटर इंडिया: ए बेटर वर्ल्ड, पेंग्विन बुक्स, २००९ अ क्लिअर ब्लू स्काय: स्टोरीज अँड पोम्स ऑन कॉन्फ्लिक्ट अँड होप, पफिन बुक्स इंडिया, २०१७ द विट अँड विजडम ऑफ नारायण मूर्ती, हे हाऊस, २०१६
पुरस्कार २००० – पद्मश्री पुरस्कार २००८ – पद्मविभूषण पुरस्कार २००८ – लीजन ऑफ ऑनरचे अधिकारी २०१२ – हूवर पदक २०१३ – सयाजी रत्न पुरस्कार.
सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात.
संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत.
सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम.ई. झाल्या आहेत.त्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम्. टेक. ही पदवी आहे. सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात.
इन्फोसिस फाऊंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत.
त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.
सुधा मूर्ती यांचे प्रकाशित साहित्य
अस्तित्व आजीच्या पोतडीतील गोष्टी आयुष्याचे धडे गिरवताना द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी) कल्पवृक्षाची कन्या: पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री, मराठी अनुवाद – लीना सोहोनी गोष्टी माणसांच्ता जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी) डॉलर बहू (इंग्रजी)-(मराठी) तीन हजार टाके (मूळ इंग्रजी, ’थ्री थाउजंड स्टिचेस’; मराठी अनुवाद लीना सोहोनी) थैलीभर गोष्टी परिधी (कानडी) परीघ (मराठी) पितृऋण पुण्यभूमी भारत बकुळ (मराठी) द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी) महाश्वेता (कानडी व इंग्रजी) वाइज अँड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी) सामान्यांतले असामान्य (अनुवाद उमा कुलकर्णी) २०१७ सुकेशिनी हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँड अदर स्टोरीज (इंग्रजी)
पुरस्कार आणि सन्मान संपादन इ.स.१९९५ साली उत्तम शिक्षक पुरस्कार (बेस्ट टीचर अवोर्ड ) इ.स.२००१ साली ओजस्विनी पुरस्कार इ.स. २००६ – भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. इ.स. २००६ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशनकडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार.[१२] इ.स. २०१० – एम.आय.टी.कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार. सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावरील सन्मान सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी इ.स. २०२३ – भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार