+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
आंतरराष्ट्रिय विज्ञान संकुलात वृक्ष दिंडी चे उत्साहात आयोजन

आंतरराष्ट्रिय विज्ञान संकुलात वृक्ष दिंडी चे उत्साहात आयोजन

दिनांक 17.07.2024

आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परिसर येथे वृक्षदिंडी चे परभणी अस्त्रोनॉमिकल सोसायटी व वृक्षवल्ली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते.
वृक्षदिंडी ची सुरुवात , विज्ञान चौक – राजगोपालचारी उद्यान पासून होऊन त्याचा शेवट आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परिसर येथे झाला.


वृक्षदिंडीमध्ये साधारणपणे 500 पेक्षाही अधिक विद्यार्थी , तसेच पालक आणि शिक्षक संमीलित झाले, यादरम्यान बालगोपाल वारकऱ्यांनी पावली खेळत तसेच पथनाट्य सादरीकरण करत, अभंग गात वृक्षदिंडी मध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी , तसेच जिल्ह्याचे अप्पर पोलीस निरीक्षक श्री यशवंत जी काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या प्रसंगी बोलताना डॉक्टर पी. आर. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या निर्मितीबाबत माहिती दिली, तद्वतच वृक्षवल्ली फाउंडेशनचे डॉक्टर देवानंद ओमनवार यांनी ” एक पेड मां के नाम ” असा नारा देत वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले , तसेच अप्पर पोलीस निरीक्षक यशवंत काळे यांनी वातावरणातील बदलासाठी वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये वृक्ष संगोपन याबद्दल विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
वृक्षदिंडी साठी शहरातील नामवंत शाळा उपस्थित होत्या त्यामध्ये ऍकमे इंग्लिश स्कूल , ज्योतिर्गमय स्कूल , सारंग स्वामी विद्यालय, संस्कृती विद्यालय, बळीराजा विद्यालय, या अग्र स्थानी होत्या.

वृक्षदिंडीमध्ये शहरातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये पोलिस उप अधीक्षक श्री दिगंबर डंबाळे, डॉ नेहरकर, डॉ कातनेश्र्वरकर, डॉ कलकोटे, डॉ. केदार खटिंग, डॉ आनंद अनेराव, डॉ आनंद लाड, डॉ सौ मानवतकर, श्री अनुप शुक्ल, डॉ. भोसले , डॉ. राजेश मंत्री , डॉ. बंगाळे, श्री आशिष निलावार , श्री प्रशांत कायांदे, श्री पवन देशमुख, श्री कल्याण देशमुख.

तसेच सौ अंजली बाबर, सौ प्रिया ठाकुर, सौ. सूर्यवंशी, श्री. अक्षय देसरडा, श्री नारायण निलंगे, श्री ज्ञानेश्वर जोगदंड, श्री. पेडगावकर, सौ कमल पाटिल, सौ डॉ निरस, डॉ निखिल केंद्रेकर, सौ घोडे, सौ पोटेकर, श्री कृष्णा झरकर, श्री नितिन फुटाणे,श्री नागेश वाईकर, श्री. सुभाष जाधव, श्री कल्याण भारोसे, श्री प्रसन्न भावसार, श्री बंडेवार श्री लिंगायत , श्री मजीद भाई.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी अस्ट्रॉनोमिकल सोसायटी च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

दिनांक 22.06.2024

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर दिनांक 17जुन ते 20 जुन दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

त्यात पहिल्या दिवशी , उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे श्री बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती लाभली, तसेच विनोदराय इंडस्ट्रीचे श्री सुनिल जी रायथट्टा यांनी करियर इन इंजिनीअरिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच भूगर्भ शास्त्र विषयी श्री अमर कच्छवे यांनी विचार मांडले. तद्नंतर श्री पार्थ दराडे यांनी खगोशास्त्र या विषया बद्दल माहिती दिली, तसेच श्री ॲड दराडे यांनी विधी व न्याय या विषयी विचार मांडले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मैसूर येथून आलेल्या डॉ शाम गरुड यांनी अन्न तंत्रज्ञान या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. जगप्रसिद्ध तैल चित्रकार श्री शिवराज जगताप यांनी मुलांना कला क्षेत्र या विषयातील संधी या वर मार्गदर्शन केले. तद्वतच श्री अनुप जी शुक्ल यांनी वाणिज्य क्षेत्रा विषयी च्या जागतिक संधी या बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री तरवटे यांनी तंत्रविद्या निकेतन तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आभयासक्रम या विषयी ओहपोह केला. श्री संदीप राजपुरे यांनी मुलांना प्रशासकीय सेवे तील उपलब्ध संधी या बद्दल सखोल विवेचन केले.

तिसऱ्या दिवशी श्री कर्नल समीर गुज्जर यांनी राष्ट्रिय सैन्य दलातील सेवेच्या बद्दल मार्गदर्शन केले. तद्नंतर रसायशास्त्र या विषयातील ज्येष्ठ प्रा. भीमराव खाडे यांनी मुलांना मूलभूत व्याज्ञाना सोबतच रसायनशास्त्र या विषयावर सखोल विवेचन केले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ प्रा. श्री रोहिदास नितोंडे यांनी साहित्य भाषा आणि लेखन या क्षेत्रा विषयी विचार मांडले. भारतीय डाक विभागाकडून श्री कुलकर्णी यांनी मुलांना माहिती दिली. श्री संग्राम देशपांडे यांनी क्वांटंम मेकॅनिकस् या विषयावर अधिक माहिती दिली.

शिबियाच्या चौथ्या दिवशी, श्री आनंद नागरगोजे यांनी पदार्थ विज्ञान या विषयातील संधी या बद्दल सविस्तर तपशील दिला. प्रसिध्द मनोविकार तज्ञ डॉ जगदीश नाईक यांनी करियर मधील ताण तणाव व त्या वरील उपाय या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. तद्वतच श्री मंगेश मुंदडा यांनी अन्न प्रक्रिया व उद्योग या विषयावर सखोल विवेचन केले. श्री उर्जीत भावसार आणि श्री सम्यक घोडके यांनी त्यांच्या सक्सेस स्टोरी बद्दल कथन केले.

शिबिराचि सांगता सामजिक कार्यकर्त्या तसेच जागतिक कचरा वेचक संगठना उपाअध्यक्ष श्रीमती सुशीला विठ्ठलराव साबळे याच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली, त्या प्रसंगी श्रीमती प्रिया ठाकुर उपस्थीत होत्या.

शिबिराच्या यशस्वीेतेसाठी जिल्ह्यातून सर्व शाळेचा सहभाग लाभला, तसेच परभणी अस्त्रोनोमिकॅल सोसायटीत च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .

आज पासून आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात करिअर मार्गदर्शन शिबिर

आज पासून आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात करिअर मार्गदर्शन शिबिर

दिनांक 17.6.2024

आज परभणी येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यावर विविध विषयावर करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे शिबिर दिनांक 17.6.2024 पासून 20.6.2024 पर्यन्त रोज, सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजे पर्यंत असेल.

त्यासाठी जालन्याचे प्रसिद्ध उद्योजक श्री सुनील जी राईथात्ता हे उपस्थीत राहणार असून ते करियर इन इंजिनिअरींग यां विषयावर मार्गदर्शन करनार आहेत, तसेच पृथ्वी विज्ञान या विषयावर श्री अमर कच्छवे, तर पदार्थ विज्ञान या विषयावर करिअर मार्गदर्शन करण्यासाठी श्री आनंद नागरगोजे हे विषय तज्ञ म्हणुन उपस्थीत आसणार आहेत.

त्याच बरोबर, विधी व न्यायालय या संबंधित माहीत श्री अँड दराडे हे देणार आहेत.

आणि भारता बाहेरील विज्ञान विषयातील संधी, या विषयाचा ओहापोह करण्यासाठी श्री पार्थ दराडे आज येणारं असून सर्व विद्यार्थी तसेच पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन परभणी अस्त्रोनॉमीकल सोसायटी तर्फे करण्यात आले आहे

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

इतिहासात पहिले भारतीय रँग्लर

16 फेब्रुवारी 1876.
6 मे 1966.

हिंदुस्थानातील विश्व विद्यालयीन परीक्षेत नेहमी प्रथम येणारे आणि केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील सर्वात कठीण ‘ट्रायपॉस’ पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ‘सिनियर रँग्लर’ हा बहुमान मिळवणारे पहिले भारतीय र. पु. परांजपे म्हणजेच “रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे”.

रँग्लर पदवी म्हणजे काय? पूर्वी केंब्रिज विद्यापीठात गणित विषयाच्या अंतिम परीक्षेत पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यास रँग्लर म्हणून घोषित केले जाई. रँग्लर म्हणून सर्वप्रथम येणाऱ्यास सिनियर रँग्लर म्हटले जाई. र. पु. परांजपे १८९९ मध्ये सिनियर रँग्लर म्हणून परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा लेखी नसून तोंडी असतं. परीक्षार्थी विद्यार्थ्यास तिपाई स्टूलावर बसविले जायचे म्हणून या परीक्षांना ‘ट्रायपॉस’ परीक्षा असे नाव पडले. प्रश्नकर्ते प्राध्यापक समोर खुर्चीवर बसून अत्यंत कठीण प्रश्न विचारून विद्यार्थ्यास जेरीस आणत व ज्ञानाची खरी कसोटी घेत. सिनियर रँग्लर विद्यार्थ्यास पुढे अनेक सन्मान व सवलती मिळत. अशा विद्यार्थ्याचे पुढचे शिक्षण खास सुविधांसह होत असे, त्याला कोलेजची फेलोशिप मिळे, विद्यापीठात चांगले पद तसेच पुस्तक लिहण्याचे आमंत्रण मिळे.

कालांतराने लेखी परीक्षा सुरु झाल्या. र. पु. परांजपे यांचा जन्म दापोली तालुक्यातील आंजर्ले जवळच्या मुर्डी या गावी १६ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे वडील पुरुषोत्तम हे खुप हुशार होते. बुद्धिमत्तेचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. र. पु. हे तेरा भावंडापैकी सातवे. भारतरत्न कर्वे व रँग्लर परांजपे ही आत्ये मामे भावंडं. कर्वेंनी र. पु. ना शिक्षणाखातर भरपूर मदत केली. र.पु.चे प्राथमिक शिक्षण आंजर्ले, मुरुड, दापोली येथे झाले व उच्चशिक्षण मुंबई, पुणे येथे. त्यांनी बी.एस.सी. सर्व पारितोषिकासह पास केलेली. त्यांच्या उज्ज्वल कामगिरीमुळे त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व ते इंग्लंडला गेले.

१८९९ साली भारतातील पहिले ‘रँग्लर’ म्हणून इंग्रज सरकार तर्फे त्यांचा बहुमान झाला.

१९०२ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांना फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पद मिळाले. दहा वर्षे ते या पदावर होते.

१९१३ साली मुंबई कायदेमंडळाचे सरकारी नियुक्त झाले.

१९१४ मध्ये पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले. ( ३ वर्ष पदावर )

१९१६ ते १९२० विधिमंडळात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना सदस्यत्व मिळाले.

१९२१ साली त्यांची मुंबईचे शिक्षण व आरोग्यमंत्री म्हणून शासनाकडून नियुक्ती झाली ( १९२३ पर्यंत ).

१९२७ मध्ये वनविभाग, सहकार व कृषिविभागाचे मंत्री ( ६ महिने पदावर ) म्हणून कार्यरत होते.

१९२७ ते १९३२ पर्यंत लंडनमधील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य त्यांना मिळाले.

१९३२ साली लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू ( ६ वर्ष ) आणि

१९४४ ते १९४७ पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे उच्चायुक्त झाले.

१९४९ साली चेन्नई मधल्या ‘भारतीय बुद्धिप्रामाण्यवादी संघटनेचे’ संस्थापक व अध्यक्ष ही ते झाले.

१९५८ मध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ( ३ वर्ष ) झाले.

बुद्धिवादी, कर्ते समाजसुधारक म्हणून त्यांचा लौकिक होता. गोपाळ कृष्ण गोखल्यांना ते आपले गुरु मानीत. त्यांचे मोडी हस्ताक्षर फार सुंदर, सुरेख होते. १९३८ साली त्यांनी आपल्या जन्मगावी शाळा सुरु केली. त्याचे नाव ‘गोपाळ कृष्ण गोखले’ स्कूल ठेवले. त्याच शाळेत त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे ग्रंथालय देखील सुरु केले. वाचा: दापोलीतील मोडी लिपी जाणकार ‘तेजोनिध रहाटे’ बद्दल दापोलीच्या रस्त्यांवरून चालताना पटापट गणित सोडवत जाणारा मुलगा, जो पुढे गणिततज्ञ व शिक्षणतज्ञ झाला, ‘सिनियर रँग्लर’ हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय ठरला.

6 मे 1966 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

जिंतूर च्या भानुदासाची इस्रो भरारी….

जिंतूर च्या भानुदासाची इस्रो भरारी….

दिनांक 31/3 /2013

इंटरनॅशनल सायन्स पार्क परभणी , येथे परभणी अस्त्रोनोमिकल सोसायटी च्या वतीने श्री भानुदास बाबासाहेब कवडे, राहणार पांढरगळा ,तालुका जिंतूर जिल्हा परभणी, यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे तांत्रिक सहाय्यक वर्ग दोनच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

भानुदास ने आपला प्रवास सांगत असताना ह्या प्रवासात त्याला बऱ्याचशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच घ्यावे लागले घरची हालाखीची परिस्थिती शेतकरी कुटुंब कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा मार्गदर्शक नसताना त्याने जे पुढे आले त्याला आपलंसं करून हा प्रवास पूर्ण केला बऱ्याचदा वडिलांना बाहेरगावी जायचं असेल तर भानुदास ला आपल्या शेतातील दोन बैलांना सांभाळण्यासाठी शेतात जावं लागत असे.

कशीबशी दहावी पास झाल्यानंतर अकरावी मध्ये जिंतूर या ठिकाणी कॉलेजला सायन्स फॅकल्टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला तिथे सायन्स ची स्पेलिंग न आल्यामुळे त्याला अकरावी सायन्स ला प्रवेश मिळाला नाही, पण कोणीतरी पॉलिटेक्निक बद्दल सांगितले, की पॉलिटेक्निक केल्यामुळे कंपनीमध्ये नौकरी मिळेल व आपला प्रपंच चालेल, म्हणून त्याने सेलू येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला.

सर्व काही इंग्रजी भाषेत असल्यामुळे प्रथम वर्षात त्याची फक्त गणित या विषयामध्ये तो पास झाला . केमिस्ट्री, फिजिक्स सारखे सर्वच विषय हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते विषय पूर्ण बॅक राहिले, मग पहिल्या टर्म चे विषय दुसऱ्या टर्मला दुसऱ्या टर्मचे तिसऱ्या टर्म असे करत करत तीन वर्षाचे पॉलिटेक्निक तीन वर्षातच पूर्ण करण्यात भानुदास ला यश मिळाले .

नंतर इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळतं आणि इंजिनिअरिंगची डिग्री मिळून आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो ह्या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केले. पण घरच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस इंजिनिअरिंगची फीस भरू न शिकल्यामुळे त्याने आपल्याकडे असलेल्या शेतीवर एज्युकेशन लोन मिळून, संभाजीनगर येथे कॉलेजला प्रवेश मिळवला. त्यावेळेस त्याच्यासोबत चांगलं मार्गदर्शन व चांगल्या कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी हुशार विद्यार्थी होते या सगळ्यांमध्ये प्रचंड मेहनत करून इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली.

इंजिनिअरिंग झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करून कंपनी जॉब मिळेल.पण कंपनीत जॉब मिळत नव्हता म्हणून एम. टेक. करत असताना स्टाय फंड मिळतो म्हणून त्याने पुणे येथे एम. टेक. ला प्रवेश घेतला .प्रवेश मिळण्यासाठी गेट सारखी परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेसाठी कोचिंग हैदराबाद दिल्ली पुणे मोठ्या शहरामध्येच होते, मग त्याने हैदराबाद येथील एका कोचिंग क्लासेसचे पोस्टल स्टडी मटेरियल मागून घेऊन सेल्फ स्टडी करून ऍडमिशन मिळवले.

पुण्यासारख्या ठिकाणी बारा हजार चारशे रुपये मध्ये महिना घालवला व अभ्यास केला त्यानंतर कोविड आल्यामुळे गावी परत यावे लागले. गावी एक वर्ष पूर्णपणे शेतात काम केले आणि एक वर्षानंतर त्याला त्याच्या पीजी चा प्रोजेक्ट व पीजी पूर्ण करण्यासाठी तो परत पुण्याला गेला आणि तेथे पूर्ण अभ्यास करून पी. जी. पूर्ण केले , पीजी चा अभ्यास करत असतानाच स्पर्धा परीक्षा मध्ये लागण्यासाठी स्पर्धा परीक्षा चा पण अभ्यास चालू ठेवला.

2023 मध्ये इस्रो ची जाहिरात आली आणि त्यांची परीक्षा देऊन चांगल्या पद्धतीत भारतामधून सातव्या क्रमांक घेऊन पास झाला…..

आज व्यवस्थेच्या उणीवेचीच जाणीव, जणू भानुदासाची प्रेरणा बनली आणि भानुदास इस्रो कडे झेपावला………