+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
मेळघाटावरील मोहोर – पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ डॉ स्मिता कोल्हे

मेळघाटावरील मोहोर – पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ डॉ स्मिता कोल्हे


       असामान्य संघर्षाची कहाणी पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे मेळघाट यांची परभणीकरायांसाठी मुलाखतीची परवणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणी च्या वतीने पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर सौ स्मिताताई रविंद्र कोल्हे यांच्या मुलाखतीचे आयोजन सोमवार दिनांक 03 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता कृषी विद्यापीठाच्या ऑडिटोरियम सभागृह मुख्य इमारतीमध्ये लायब्ररीच्या शेजारी केली आहे.

 सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दांपत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे. आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदावलीत अधिक बहरतो आहे आणि त्याची व्याप्ती सर्वदूर पसरते आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचे म्हणजे काय, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोल्हे दांपत्य.

        मेळघाट - सातपुडा पर्वताच्या डोंगररांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश. त्यातले बैरागड म्हणजे तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेले बेटासारखे गाव. तिथल्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणार्‍या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाने आज इथे अनपेक्षित बदल बघायला मिळतो आहे. मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दांपत्याला भेटायला जाणेही किती कठीण आहे, हे तिथे गेल्यावरच जाणवते.

परभणीकरांचे भाग्य म्हणावे लागेल की हे दोन्ही दांपत्य प्रभावती नगरीमध्ये येत आहेत आणि त्यांच्या मेळघाट संघर्षाच्या प्रवासाची मुलाखत आपल्या सर्वांसाठी एक मोठी अविस्मरणीय  पर्वणी ठरणार आहे.

      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने सर्व विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक समाजसेवक  व नागरिक यांनी असामान्य संघर्ष मुलाखतीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन   करण्यात आले आहे.
मेघना साहा

मेघना साहा

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

झाले बहु होतीलही बहु! परी या सम हा!

खगोल भौतिकी इतिहासात आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात मेघना साहा यांचे स्थान अद्वितीय आहे,हे कौतुकाचे बोल आहेत नोबेल पुरस्कार विजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे.

यांचा जन्म बांगलादेशातील ढाका या जिल्ह्यातील सेओरातली या गावात झाला. वडील जगन्नाथ साहा आणि आई भुवनेश्वरी देवी यांचे ते पाचवे अपत्य, ते किराणा दुकान चालवायचे आणि आपल्या भल्या मोठ्या परिवाराचे पालन पोषण करायचे.तुटपूंज्या पैशात आपल्या मुलांना शिकविण्याची त्यांची क्षमता नव्हती.त्यामुळे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणाच्या नावाने एक मोठे प्रश्नचिन्ह साहा तयांच्यासमोर होते. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी दहा किलोमीटर सिमुलिया या गावी जावे लागणार होते.

जाण्या येण्याचा खर्च देखील आई-वडील करू शकत नव्हते.पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग झाले तर मेघनाथ यांचे ज्येष्ठ बंधू जैनाथ एक जूट कंपनीत काम करायचे, त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर होते अनंत कुमार दास यांच्या मदतीने पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होणार होता. डॉक्टर खूप चांगले होते ,त्यांनी मेघनाथला आपल्या घरी ठेवून घेतले राहणे व खाणे ही तर व्यवस्था झालीच पण मेघनाथला घरातील लहान-मोठी कामे करावी लागायची, गाईचा गोठा स्वच्छ ठेवणे,भांडी घासणे, अशी कामे करून त्यांनी शिक्षण चालू ठेवले. मनापासून अभ्यास केला आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. शिवाय त्यांना दर महिन्याला चार रुपये शिष्यवृत्ती पण मिळू लागली.

त्यानंतर 1905 साली साहा यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका येथील विद्यालयात प्रवेश मिळवला. 1905 हे वर्ष फार महत्त्वाचे मानले जाते कारण भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली. सगळीकडे संघर्ष, हिंसाचार, अशांतता असे वातावरण होते. विद्यालयावर पण घटनेचा परिणाम झाला आणि मेघना साहा यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढून टाकण्यात आले. साहा यांच्यावर जणू आभाळच कोसळले.पण संकटांना घाबरणाऱ्यापैकी ते नव्हते “केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे” या युक्तीप्रमाणे ते पुन्हा शिक्षणासाठी वन वन फिरू लागले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. किशोरीलाल जुबली विद्यालयात त्यांना शिष्यवृत्ती सहप्रवेश मिळाला. गणित आणि इतिहास हे दोन विषय त्यांना खूप आवडायचे. त्यांचे वाचनही भरपूर होते रवींद्रनाथ टागोर, मधुसूदन दत्त आहे त्यांचे आवडते लेखक.

1909 साली त्यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे 1911साली कलकत्ता विद्यालयाची इंटरमीडिएट परीक्षा पास करून रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्यावेळी सत्येंद्रनाथ बसू त्यांचे सहाध्यायी होते.भारतीय सांख्यिकी संस्थांचे संस्थापक प्रशांतचंद्र त्यांचे सीनियर होते.प्रफुल्लचंद्र राय त्यांना रसायनशास्त्र शिकवत तर जगदीश चंद्र बसू भौतिकशास्त्र.. शिकवायचे.1913 साली मेघनाथ यांनी गणित विषय घेऊन बीएससी आणि 1915 मध्ये एम एस सी परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे 1913 साली गणित विभागाचे रुजू झाले. पण एका वर्षात त्यांना भौतिकशास्त्र विभागात स्थलांतरित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील द्रव स्यैतीकी, स्पेक्ट्रामिकी आणि उष्णगतीकी थर्मो डायनामिक्स यासारख्या विषयावर व्याख्यान द्यायला त्यांनी सुरुवात केली.त्यातच त्यांनी तापीक आयननचा सिद्धांत सादर केला. 1918 साली कलकत्ता विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही पदवी मिळवण्यासाठी विकिरण दाब रेडिएशन प्रेशर आणि विद्युत चुंबकीय विकीरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यावर आपले संशोधन त्यांनी सादर केले.

त्यानंतर ते दोन वर्षे विदेशात गेले.दोन वर्ष युरोप व नंतर बर्लिन 1921 ला पुन्हा मायदेशी परतले.1923 साली साहा अलाहाबाद येथील विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात कार्यरत होते. सांख्यिकीय यांत्रिकी स्टॅटिकल मेकॅनिक्स, परमाणु आणि आण्विक स्पेक्ट्रामीकी अटोमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोमेट्री ,ऋर्णविद्युत तत्त्वांची इलेक्ट्रॉन बंधुता, अणूंचे उच्चताप नियोजन, आयन मंडळातील रेडिओ लहरी,इत्यादी त्यांच्या या संशोधनपर कार्याचे देशातील तरुणांना आकर्षित केले.

अलाहाबाद शहरात साहा यांचे पहिले पुस्तक’ ए टेक्स्ट बुक ऑफ हिट’ हे प्रकाशित झाले. या विषयावर प्रशिक्षण देणारे ते पहिले भारती होते . एस एन बसू यांच्यासोबत साहा यांनी आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांत या विषयावरील लेखाचा जर्मनीतून इंग्रजी भाषेत अनुवाद केला व पुस्तक प्रकाशित केले.ते काही काळ राष्ट्रीय योजना समितीचे सक्रिय सदस्य होते.भारतीय संसदेत त्यांनी निर्वाचित निर्दय सदस्य देखील होते. 1930 साली अलाहाबाद येथे उत्तर प्रदेश विज्ञान अकादमीची स्थापना त्यांनी केली. राष्ट्रीय विज्ञान अकामी म्हणून आजही संस्था कार्यरत आहे. 1933 आली त्यांनी कलकत्ता येथे भारतीय भौतिकी सोसायटीची स्थापना केली. 1970 मध्ये या संस्थेचे नामकरण आय एन एस ए अर्थात राष्ट्रीय भारतीय विज्ञान अकादमी असे करण्यात आले. विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी इंडियन सायन्स न्यूज असोसिएशनची स्थापना 1935 मध्ये केली. त्यात त्यांनी जवळपास 200 पेक्षा जास्त लेख लिहून प्रकाशित केले.

16 फेब्रुवारी 1956 रोजी नवी दिल्ली येथे योजना आयोग या आपल्या कार्यालयात जात असताना हृदविकाराच्या धक्क्याने हा वैज्ञानिक काळाने हिरावून नेला. साहा यांचे जीवन म्हणजे केवळ समर्पण होय त्यांची दूरदृष्टी त्यांचा अभ्यास संशोधन म्हणजे देशाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे .अशा या थोर शास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा.झाले बहु होतील ही बहु परी या सम हा!

संकलन- डॉ. बी व्ही लिंबाळकर

शब्दांकन- सुचिता खनगई विज्ञान सेनानी

शांतीस्वरूप भटनागर

शांतीस्वरूप भटनागर

नमस्कार🙏🏻🙏🏻

शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म भारतातील पंजाब प्रांतातील शापूर जिल्ह्यात भेडा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील परमेश्वर सहाय भटनागर हे पंजाब विश्वविद्यालयाचे प्रतिष्ठित पदवीधर होते. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांना गरिबीत जीवन जगावे लागले.वडिलांच्या निधनाच्या वेळी शांतीस्वरूप यांचे वय अवघे आठ महिन्याचे होते. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत शांतीस्वरूप आपल्या आजोळी राहिले.

त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या सहाय्याने त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम व संकल्प च्या बळावर त्यांनी भरपूर प्रतिष्ठा मिळवली. प्राथमिक शिक्षण एका खाजगी शाळेत झाले. त्यानंतर ए पी हायस्कूल सिकंदराबाद उत्तर प्रदेश येथे पुढील शिक्षणासोबत ते विविध काम पण करत होते. त्यानंतर लाहोर इथून प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली.

इ.स. 1911 मध्ये त्यांनी दलाईसिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1913 झाली त्यांनी पंजाब विश्वविद्यालयाचे इंटरमीडिएट परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली. त्यानंतर ते बीएससी झाले .फोरमैन क्रिसवियान कॉलेज मध्ये भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र या विभागात डेमोस्त्रेटर म्हणून रुजू झाले. इसवी सन 1919 मध्ये त्यांनी एमएससी रसायनशास्त्रामध्ये पूर्ण केली. इसवी सन 1921 मध्ये शांतीस्वरूप यांनी प्रो एफ जी डोनाल्ड यांच्या मार्गदर्शनात इंग्लंड विश्वविद्यालयातून डी एस सी ची पदवी मिळवली.

भारतात परतल्या नंतर काशी हिंदू विश्वविद्यालयात रसायनशास्त्राची प्रोफेसर म्हणून ते काम करू लागले. नंतर ते लाहोरला गेले पंजाब विश्वविद्यालयात रसायन व भौतिकशास्त्राच्या निदेशक पदावर त्यांनी सोळा वर्षे काम केले.

आपल्या संशोधन जीवनातील प्राथमिक अवस्थेत त्यांनी चुंबकाची उपयोग या विषयावर अभ्यास केला के एन माथूर या आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चुंबकीय सुग्रहिता मध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांना मोजण्याचे एक अत्यंत संवेदनशील उपकरण बनविले. याच उपकरणाला भटनागर माथुर चुंबकीय व्यतीकरण तुला असे नामाभीधान देण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेतला उसाच्या चिपाटापासून प्राण्यांसाठी ढेप कशी तयार करता येईल, या प्रक्रियेत त्यांनी विकास केला. एक एप्रिल 1940 रोजी भटनागर यांना वैज्ञानिक व औद्योगिक बोर्डाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले. त्यांनी भारत सरकारकडून औद्योगिक अनुसंधान उपयोग समिती I.U.R.C. साठी मान्यता प्राप्त केली.I U R.C. च्या शिफारशीनंतर संशोधन क्षेत्रात पुढे सरकारी उद्योगातून मिळणाऱ्या रॉयल्टी चा एक वेगळा कोश निर्माण करण्यात आला. 1943 मध्ये भटनागर यांच्या पाच राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या स्थापनेसाठी C.S.I.R.ने परवानगी दिली. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे, राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा नवी दिल्ली, राष्ट्रीय धातूकर्म प्रयोगशाळा जमशेदपूर, इंधन अनुसंधान केंद्र धनबाद तथा केंद्रीय कांच सिरॅमिक अनुसंधान संस्थान कोलकत्ता, या त्या पाच प्रयोगशाळा आहेत. 1954 पर्यंत बारा राष्ट्रीय प्रयोगशाळा ची स्थापना करण्यात आली. भटनागर केवळ प्रख्यात वैज्ञानिक नव्हते तर कुशल प्रशासक व संयोजक पण होते.

सी एस आय आर ने भौतिकी रसायनिक जीवशास्त्र तसेच मेडिकल सायन्स व इंजिनिअरिंग विषयातील संशोधनासाठी एस एस भटनागर मेमोरियल अवॉर्ड ची घोषणा केली आहे.

या महान शास्त्रज्ञाचे नवी दिल्ली येथे 1 जानेवारी 1955 ला हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. अशा या चतुरस्त व महान वैज्ञानिकाला शतशः नमन..🙏🏻🙏🏻🙏🏻

संकलन डॉ. बी. व्ही. लिंबाळकर