शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म भारतातील पंजाब प्रांतातील शापूर जिल्ह्यात भेडा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील परमेश्वर सहाय भटनागर हे पंजाब विश्वविद्यालयाचे प्रतिष्ठित पदवीधर होते. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांना गरिबीत जीवन जगावे लागले.वडिलांच्या निधनाच्या वेळी शांतीस्वरूप यांचे वय अवघे आठ महिन्याचे होते. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत शांतीस्वरूप आपल्या आजोळी राहिले.
त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या सहाय्याने त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम व संकल्प च्या बळावर त्यांनी भरपूर प्रतिष्ठा मिळवली. प्राथमिक शिक्षण एका खाजगी शाळेत झाले. त्यानंतर ए पी हायस्कूल सिकंदराबाद उत्तर प्रदेश येथे पुढील शिक्षणासोबत ते विविध काम पण करत होते. त्यानंतर लाहोर इथून प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली.
इ.स. 1911 मध्ये त्यांनी दलाईसिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1913 झाली त्यांनी पंजाब विश्वविद्यालयाचे इंटरमीडिएट परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली. त्यानंतर ते बीएससी झाले .फोरमैन क्रिसवियान कॉलेज मध्ये भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र या विभागात डेमोस्त्रेटर म्हणून रुजू झाले. इसवी सन 1919 मध्ये त्यांनी एमएससी रसायनशास्त्रामध्ये पूर्ण केली. इसवी सन 1921 मध्ये शांतीस्वरूप यांनी प्रो एफ जी डोनाल्ड यांच्या मार्गदर्शनात इंग्लंड विश्वविद्यालयातून डी एस सी ची पदवी मिळवली.
भारतात परतल्या नंतर काशी हिंदू विश्वविद्यालयात रसायनशास्त्राची प्रोफेसर म्हणून ते काम करू लागले. नंतर ते लाहोरला गेले पंजाब विश्वविद्यालयात रसायन व भौतिकशास्त्राच्या निदेशक पदावर त्यांनी सोळा वर्षे काम केले.
आपल्या संशोधन जीवनातील प्राथमिक अवस्थेत त्यांनी चुंबकाची उपयोग या विषयावर अभ्यास केला के एन माथूर या आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चुंबकीय सुग्रहिता मध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांना मोजण्याचे एक अत्यंत संवेदनशील उपकरण बनविले. याच उपकरणाला भटनागर माथुर चुंबकीय व्यतीकरण तुला असे नामाभीधान देण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेतला उसाच्या चिपाटापासून प्राण्यांसाठी ढेप कशी तयार करता येईल, या प्रक्रियेत त्यांनी विकास केला. एक एप्रिल 1940 रोजी भटनागर यांना वैज्ञानिक व औद्योगिक बोर्डाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले. त्यांनी भारत सरकारकडून औद्योगिक अनुसंधान उपयोग समिती I.U.R.C. साठी मान्यता प्राप्त केली.I U R.C. च्या शिफारशीनंतर संशोधन क्षेत्रात पुढे सरकारी उद्योगातून मिळणाऱ्या रॉयल्टी चा एक वेगळा कोश निर्माण करण्यात आला. 1943 मध्ये भटनागर यांच्या पाच राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या स्थापनेसाठी C.S.I.R.ने परवानगी दिली. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे, राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा नवी दिल्ली, राष्ट्रीय धातूकर्म प्रयोगशाळा जमशेदपूर, इंधन अनुसंधान केंद्र धनबाद तथा केंद्रीय कांच सिरॅमिक अनुसंधान संस्थान कोलकत्ता, या त्या पाच प्रयोगशाळा आहेत. 1954 पर्यंत बारा राष्ट्रीय प्रयोगशाळा ची स्थापना करण्यात आली. भटनागर केवळ प्रख्यात वैज्ञानिक नव्हते तर कुशल प्रशासक व संयोजक पण होते.
सी एस आय आर ने भौतिकी रसायनिक जीवशास्त्र तसेच मेडिकल सायन्स व इंजिनिअरिंग विषयातील संशोधनासाठी एस एस भटनागर मेमोरियल अवॉर्ड ची घोषणा केली आहे.
या महान शास्त्रज्ञाचे नवी दिल्ली येथे 1 जानेवारी 1955 ला हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. अशा या चतुरस्त व महान वैज्ञानिकाला शतशः नमन..🙏🏻🙏🏻🙏🏻
सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते.घरची परिस्थिती थोडी कठीण असल्यामुळे कधी कधी आई-वडिलांना मदत व्हावी म्हणून सत्येंद्रनाथ छोटी मोठी काम करायचे.
सत्येंद्रनाथाचे बालपण कोलकत्ता मध्येच गेले. शिक्षण ही काळाची गरज असते, हे सत्येंद्रनाथ यांना माहीत होतं. लहानपणापासूनच त्यांना अभ्यास करण्याची फार आवड होती. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. 1915 मध्ये सत्येंद्रनाथ यांनी गणितात एम.एससी. ची पदी मिळवली. 1915 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून सत्येंद्रनाथांना पदवी मिळाली तेव्हा ते प्रथम आले होते.
चांगल्या संगतीचा आपल्या मनावर व भविष्यावर चांगला परिणाम होतो, तसेच जर चांगल्या लोकांचे मार्गदर्शन मिळालं तर भविष्यात आपण यशस्वी होतो. सत्येंद्रनाथांनाही सुभाषचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र रॉय या दोघांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे सत्येंद्रनाथांच्या उज्वल भविष्यामध्ये मोलाची भर पडली.
सन 1916 ते सन 1921 पर्यंत सत्येंद्रनाथ यांनी कोलकत्ता येथील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा दिली. सन 1915 मध्ये महान सायंटिस्ट अल्बर्ट आईन्स्टाईनचा जर्मन भाषेतील सापेक्षता सिद्धांत इंग्रजी भाषेत रूपांतर करणारे सत्येंद्रनाथ पहिले होते. 1921 मध्ये सत्येंद्रनाथ यांनी ढाका येथील एका विद्यापीठांमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली. बोस सांख्यिकी आणि बोस कंडेन्सेटच्या सिद्धांताचा पाया विकसित करण्यासाठी १९२० च्या सुरुवातीच्या काळात क्वांटम मेकॅनिक्सवर केलेल्या कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. 1923 मध्ये प्रसिद्ध गणितज्ञ माल्ट यांनी काही शोध लावले त्या शोधाच्या समीकरणाशी संबंधित आपले स्वतःचे असे वेगळे शोध सत्येंद्रनाथांनी लावले. ते शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारी मासिक फिलोसोफिकल सोसायटी कडे पाठवण्यात आले. ते लेख आईन्स्टाईन यांनी आपल्या जर्मन भाषेत रूपांतर केले, आणि तो लेख छापून यावा म्हणून अथक प्रयत्न केले. या लेखामुळे सत्येंद्रनाथ बोस यांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली.पुढे दहा महिने ते पॅरिस मध्ये होते. पॅरिसमध्ये सत्येंद्रनाथ मेरी क्युरी सोबत काम करत होते.नंतर जर्मनीमध्ये त्यांची भेट महान प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांच्यासोबत झाली. आईन्स्टाईन यांनी त्यांचे अतिशय चांगले अतिथ्य केले.
सन 1945 मध्ये त्यांनी ढाका इथल्या नोकरीतून कायमची रजा घेतले.1956 मध्ये सत्येंद्रनाथ यांची विश्वभारती विद्यालयाचे उपकूलपती म्हणून निवड करण्यात आली.
भौतिकशास्त्र व गणित या दोन विषयाचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. बोस आईन्स्टाईन सांख्यिकी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या यामिकितील सिद्धांतकरिता यांना विशेष ओळखले जाते. त्याची दखल घेत भारत सरकारने 1958 मध्ये सत्येंद्रनाथांना पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान केला. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून 1958 मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांची निवड करण्यात आली. बोस भारत सरकारच्या राज्यसभेचे इसवी सन 1952 ते 1958 पर्यंत सदस्य होते. 1944 मध्ये भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद सत्येंद्रनाथ बोस यांच्याकडे होते.ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया या संस्थेचे देखील अध्यक्ष होते. त्यांना आईन्स्टाईन पासून प्रेरणा व स्फूर्ती मिळाली होती. बोस यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यात विज्ञानाला लोकप्रिय करण्याचे कार्य विशेष आवडीने केले. बंगाल सायन्स असोसिएशनची स्थापना त्यांनी केली. ज्ञान व विज्ञान नावाची मासिक सुरू केले.
जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञ सोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी सांख्यिकी क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करून सर्वांना चकित केले होते. बोस यांनी एक्स-रे क्रिस्टलोग्राफी सह अनेक महत्त्वाच्या विषयावर काम केले.राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे मेघनाथ सहा मेमोरियल सुवर्णपदक त्यांना मिळाले होते.
भेटीस येणाऱ्यांचे ते हसून स्वागत करीत, प्राध्यापक बोसे जेवढे उच्च कोटी शास्त्रज्ञ होते त्यापेक्षाही जास्त ते एक महामानव होते. कोलकत्ता येथे 8 फेब्रुवारी 1974 रोजी या महामानवाचे, महान शास्त्रज्ञाचे हृदविकाराने निधन झाले.
विज्ञान क्षेत्रातील त्याचे नेत्र दीपक योगदान नेहमीच सर्वोच्च स्थानी राहील अशा या महान व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻
देवेंद्र मोहन बोस यांचा जन्म २६ नोव्हेंबर १८८५ रोजी कलकत्ता येथे झाला. होमिओपॅथीमध्ये स्वतःला पात्र होण्यासाठी यूएसएला गेलेल्या पहिल्या भारतीयांपैकी ते एक होते. 1906 मध्ये, देवेंद्र बोस यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एमए पदवी प्राप्त केली. त्याने आपल्या काकांच्या बायोफिजिकल आणि प्लॉट फिजियोलॉजिकल तपासणीत भाग घेतला.
ज्यांनी वैश्विक किरण, कृत्रिम किरणोत्सर्गीता आणि न्यूट्रॉन भौतिकशास्त्र या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून दिली. 1907 मध्ये त्यांनी क्रिस्टा कॉलेज, केंब्रिज येथे प्रवेश घेतला आणि जेजे थॉमसन आणि चार्ल्स थॉमसन रीस विल्सन यांच्यासह प्रमुख भौतिकशास्त्रज्ञांसोबत कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत काम केले.1910 मध्ये ते लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ सायन्समध्ये दाखल झाले, तेथून त्यांनी 1912 मध्ये भौतिकशास्त्रात डिप्लोमा आणि प्रथम श्रेणी बीएससी मिळवले. नंतर ते कलकत्त्याला परतले आणि 1913 मध्ये कलकत्ता येथील सीटी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवले. परदेशात शिकण्यासाठी त्यांना घोष ट्रॅव्हल फेलोशिप देण्यात आली. बर्लिनमधील हम्बोल्ट विद्यापीठात दोन वर्षांसाठी प्रगत भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निवड झाली. बर्लिनमध्ये देवेंद्रला प्रोफेसर एएच रेगिन यांच्या प्रयोगशाळेत नेमण्यात आले. चेंबरमध्ये वेगाने प्रवेगक अल्फा कणांच्या उत्तीर्णतेदरम्यान तयार झालेल्या प्रतिध्वनीयुक्त प्रोटॉनच्या ट्रॅकचे छायाचित्र काढण्यात तो यशस्वी झाला. प्राथमिक तपासणीचे परिणाम 1916 मध्ये फिलोजेन्सी झीत्स्क्रिस्टा जर्नलमध्ये प्रकाशित झाले. मार्च 1919 मध्ये पीएचडी केल्यानंतर ते भारतात परतले . जुलै 1919 मध्ये, डी.एम.बोस पुन्हा रासबिहारी बोस यांच्याकडे कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1932 मध्ये, ते प्राध्यापक सीव्ही रमण यांच्यानंतर भौतिकशास्त्राचे पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले.1938 मध्ये, डीएम बोस संस्थेचे संस्थापक जेसी बोस यांच्या निधनानंतर, बोस संस्थेचे संचालक बनले.1945 मध्ये, बोस यांचा CSIR च्या अणुऊर्जा समितीमध्ये अणु रसायनशास्त्र तज्ञ म्हणून समावेश करण्यात आला. ही समिती पुढे अणुऊर्जा आयोग (AEC) बनली. कॉस्मिक रेज मध्ये त्यांनी विभा चौधरी यांच्यासोबत मोलाचे कार्य केले. अखेर 2 जून 1975 रोजी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.