+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

परभणीकरांनी वाहिली खगोलशास्त्रज्ञ डॉ नारळीकरांना श्रद्धांजली

दिनांक २० मे २०२५, परभणी

पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आज दिनांक 20 मे 2025 रोजी , आकाशाशी जडलेले नाते ,असलेल्या प्रा डॉ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली परभणीकरांच्या वतीने अर्पण करण्यात आली.

जगातील ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांनी केलेल्या कार्य अगदी सोप्या भाषेमध्ये खगोलाचा अभ्यास, खगोलीय गोष्टी आहेत , त्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मांडण्याचा काम आदरणीय प्रा डॉ जयंत नारळीकर यांनी केलेला आहे

परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल , परभणी यांच्या वतीने विज्ञान चौक,परभणी या ठिकाणी डॉ नारळीकर यांना , त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री संजयजी ससाने (शिक्षणाधिकारी योजना) तसेच आदरणीय डॉ पी आर पाटील सर, सुभाष जाधव सर, ओमसेठ तलरेजा, नागेश वाईकर सर, प्रद्युम्न शिंदे डॉ रवी शिंदे, प्रा राम कराळे त्याचबरोबर प्रसाद वाघमारे तसेच सुधीर सोनूनकर व विज्ञानप्रेमी परभणीकर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.

त्यांच्या कार्याची ओळख ही चिरंतन आणि शाश्वत असून, त्यांच्या कार्याचा उपयोग, सर्व खगोल संशोधन करणाऱ्यां विद्यार्थ्यास , संशोधकास उपयोग होईल. प्रा डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

अवकाशातील एक तेजस्वी तारा निखळला

अवकाशातील एक तेजस्वी तारा निखळला

भावपूर्ण श्रद्धांजली!!!

२० मे २०२५, परभणी

पद्मविभूषण प्रो जयंत विष्णु नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलभौतिकिशास्त्रज्ञ होते. तसेच ते उत्तम विज्ञान प्रसारक – सुधारक होते.
१९८८ मधे त्यानी IUCAA ची ,म्हणजे आंतरविद्यापीठिय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्र ची TIFR मधे असताना स्थापना केली . ते IUCAA चे संस्थापक संचालक होते.
बनारस विश्व विद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर, परदेशात केम्ब्रिज विद्यापीठत ते शिकले. प्रो फ़्रेड होयल हे त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक होते, त्यांच्या सोबत त्यानी विश्वाच्या निर्मितिचा सिद्धांत मांडला त्याला च होइल- नारलीकर सिद्धांत असे सम्बोधतात. तो सिद्धांत आइंस्टाइनच्या सिद्धांतशी समांतर होता.

परभणी तून , परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसाइटी तर्फे , दरवर्षी होत असलेल्या विज्ञानवारी च्या IUCAA प्रवासात , पुणे IUCAA त, “आस्क द सायंटीस्ट”
या सदरात प्रो जयंत नारळीकर हे स्वतः परभानीतील मुलांच्या प्रश्नाला उत्तर देत.
या वर्षी त्यानी मूलांसाठी गणित या विषयवार विशेष व्याख्यान राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित घेतले होते.
परभानीतील होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलची ते प्रेरणास्रोत आहेत.

शाश्वत विकासासाठी जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर गरजेचा

शाश्वत विकासासाठी जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर गरजेचा

प्रकट मुलाखतीतून पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितला पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र

परभणी/ 9/4/2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री चैत्राम पवार यांची प्रकट मुलाखत व नागरी सत्कार सोहळा बुधवारी (दि.९) सायंकाळी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वनामकृवि परभणी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.जगदीश नाईक आणि डॉ.विजयकिरण नरवाडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्राम पवार यांच्या व्यक्तिमत्वासह त्यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण कांतराव झरीकर, प्रमुख वक्ते हरीश कुलकर्णी व स्वागताध्यक्ष संदीप देशमुख, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्कार मिळालेले चैत्राम पवार यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. धुळे जिल्हा- सार्की तालुक्यात बारीपाडा येथे त्यांनी जवळपास 400 हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण केलेले आहे. 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून 400 हेक्टर जंगलाचे संरक्षण केले. स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी जवळपास 5 हजारहून अधिक झाडे लावली असून आजूबाजूच्या 40 गावामध्येही ही वनसंवर्धनाची चळवळ सुरू आहे अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली.
श्री.पवार यांनी घेतलेले शिक्षण, आपल्या कामाची केलेली सुरुवात, जनप्रबोधन, संघटन आदीबाबत डॉ.नाईक यांनी प्रश्न विचारून त्यांना बोलते केले.
श्री.पवार यांनी केवळ कष्टाचे डोंगर फोडले नाहीत, तर बारीपाडा गावच्या आदिवासींच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणला. अज्ञान, दारिद्य्र आणि अनारोग्य या समस्यांना तोंड देतानाच पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबवण्याचे महत्वाचे काम ते 30 वर्षापासून करत आहेत.
बेसुमार वृक्षतोड थांबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रबोधन करताना भविष्याची चिंता आणि वर्तमानातील गरज यांची सांगड घालावी लागत होती. हळूहळू त्यांची मते ग्रामस्थांना पटू लागली; पण ती अंगवळणी पडण्यासाठी काही अवधी लागला. मुळात शाश्वत विकासासाठी ते झटत होते. त्यामुळे केवळ जंगल वाढविणे किंवा वृक्षतोड थांबविणे एवढ्यापुरता त्यांचा विषय नव्हताच. जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन या पाच बिंदूंवर त्यांनी काम केले आणि त्यासाठी डॉ.आनंद फाटक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रबोधन करूनही जंगलतोड होतच होतीआणि बारीपाडा शहाणा झाला तरी आसपासच्या गावांचं काय? त्यांच्या कुर्‍हाडी कोण थांबविणार? हा प्रश्न होता. त्यामुळे गावाने नियमावली बनवली आणि सर्वजण तिचे पालन करू लागले असे श्री.पवार यांनी सांगितले.
केवळ झाडांची कत्तल थांबवायची नव्हती, तर निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करून बारीपाड्याच्या अनंत समस्यांचे उत्तर मिळवायचे होते. त्यातूनच त्याची लोकसहभागातून जैवसाखळी शाश्वत स्वरूपात उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जुन्या वृक्षांचे संवर्धन आणि नव्या झाडांची लागवड करताना जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा कधीही विसर पडू दिला नाही, असेही ते म्हणाले.
केवळ पावसावर अवलंबून असणार्‍या आणि ठरावीकच पारंपरिक पिके घेणार्‍या बारीपाड्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले.
इंद्रायणीसारखी सुवासिक तांदळाची शेती केली तशी मोहाच्या फुलांपासून निरनिराळे पदार्थ बनवले. साबण, अगरबत्ती तयार झाली.
बचतगटातून वडिलांनी घेतलेली रक्कम मुदत संपली तरी ती परत केली नाही तेव्हा वसुलीसाठी श्री.पवार यांनी सर्व सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एका क्षणात निर्णय घेतला. जेवढी रक्कम थकीत आहे तेवढ्या किमतीची भांडी घरातून उचलून आणा आणि बचत गटात ठेवा.अशा त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध केले आणि या प्रसंगामुळे बारीपाड्याच्या गावकर्‍यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला.

कधीकाळी बेसुमार वृक्षतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा बारीपाडा आता सदाहरित डोंगरासाठी आणि वाहणार्‍या ओढ्यांसाठी ओळखला जातो. निसर्ग आणि माणूस यांच्या समन्वयातून ही संपदा निर्माण झाली आहे. या कामामध्ये पुढील पिढी जोडण्याचे कामही सुरू असून 44 गावांचा समूह करून लोकसहभागातून 11 हजार 200 हेक्टर वनक्षेत पुढे आणल्याचे पवार यांनी सांगितले. आमच्याकडे महिला, पुरुष असा कुठलाच भेद नाही. वनभाजी महोत्सव 100 टक्के महिलांचा असतो. त्याला 20 वर्षे झाली असून त्यांना पूर्वी बोलता येत नव्हते अशा महिला सर्व भाज्यांची माहिती पटापट देतात. वन धन केंद्राच्या माध्यमातून 3 गावात मोहाच्या झाडासारख्या शाश्वत संसाधनांचा वापर करून उद्योग निर्मितीचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गरजा कमी करून नैसर्गिक संसाधने वाचवीण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत असे सांगून वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. जैवसाखळी ऍग्रो फॉरेस्ट्रिसारखी कामे विविध विद्यापीठे, संशोधक आदींच्या मदतीने 10 वर्षे सातत्याने काम केले तरच निश्चित बदल झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वन संवर्धन कार्यात युवकांचा वाढता सहभाग हे आशादायी चित्र असून पर्यावरणाशिवाय आपण जगूच शकत नाही हे सर्वांना कळू लागले आहे

शब्दांकन—श्री बाळासाहेब काळे.

बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा


परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम : विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

परभणी/प्रतिनिधी

गोष्ट, नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम ‘गोष्टरंग’ च्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मोठी उपस्थिती लावली.
परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘गोष्टरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बालसाहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. पहिली ते चौथीसाठी ‘हाकांचा पूल’ तर पाचवी ते आठवीसाठी ‘पेरू’ ही गोष्ट नाट्यरूपाने सादर केली. यावेळी गोष्टरंग टीमचे फेलोज सचिन चिंचोलकर, सायली जोशी, गणेश वसावे, क्वेस्टचे सचिन वीर, सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.प्रताप पाटील, डॉ.जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड, डॉ.बाहुबली लिंबाळकर, अशोक लाड, बालाजी दामुके, बबन आव्हाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश वाईकर यांनी केले तर त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले.

बालकलावंतांचा सत्कार…

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकवणार्‍या बालकलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नृसिंह विद्यामंदिर पोखर्णीच्या कु. नम्रता वाघ, कु. पंकजा वाघ, कु. उत्कर्षा वाघ यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.