+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
उद्या पहाटे चंद्र-ज्येष्ठा यांची दुर्मिळ पिधान युती

उद्या पहाटे चंद्र-ज्येष्ठा यांची दुर्मिळ पिधान युती

अवकाशामध्ये नेहमीच दुर्मिळ अशा काही खगोलीय घटना घडत असतात. त्यापैकीच एक दुर्मिळ घटना उद्या पहाटेच्या सुमारास घडणार आहे. चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते.


ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे.


5 फेब्रुवारी 2024 उद्या पहाटेच्या सुमारास पूर्व आकाशात जेष्ठ हा तारा चंद्राने झाकल्या जाईल. याला चंद्राची ज्येष्ठा बरोबर पिधान युती असे म्हणतात. हे पिधान सुरू होताना ते चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू होईल आणि त्याचा मोक्ष हा त्याच्या काळोख्या बाजूने होईल. चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास 55 वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या 14 वर्षात मात्र तो एकदाही येत नाही. ह्या पाच वर्षांच्या कालखंडात 55 वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या पिधानाला खंड पडतो. या वेळचे जे पिधान चक्र आहे ते 2023 ते 2028 आहे. योगायोगाने यावेळेच्या पिधान चक्रात 56 पिधान आहेत. त्यातले 56 पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही तीन पिधान दिवसा व दोन पिधान रात्री अशी असतील.

यातलं हे दुर्मिळ असं पिधान उद्या पहाटे आकाशात आपल्याला पाहायला मिळेल. परभणीच्या आकाशातून पिधानाचा स्पर्श 4 वाजून 46 मिनिटांनी व मोक्ष 5 वाजून 57 मिनिटांनी होईल. या खगोलीय घटनेचा जास्तीत जास्त खगोल प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

उद्या पहाटे चंद्र-ज्येष्ठा यांची दुर्मिळ पिधान युती

सत्येंद्रनाथ बोस

1 जानेवारी 1894
4 फेब्रुवारी 1974

सत्येंद्रनाथ यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.

१९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले, पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले.

आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.

१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली. सत्येंद्रनाथ बोस हे भारतीय शास्त्रज्ञ बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ.

१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.

१९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम केले. साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.

४ फेब्रुवारी १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

उद्या पहाटे चंद्र-ज्येष्ठा यांची दुर्मिळ पिधान युती

तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री

रसायनशास्त्रज्ञ

3 फेब्रुवारी 1900.
27 सप्टेंबर 1975

डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळवला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. त्यामुळे अनेक वैज्ञानिक भारतात निर्माण झाले. विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.

परतंत्र भारतात आधुनिक विज्ञानाची पायाभरणी करणार्‍या जगदीशचंद्र बोस (1858-1937), आचार्य प्रफुल्लचंद्र राय (1861-1944), सर आशुतोष मुखर्जी (1864-1924) अशा दिग्गज वैज्ञानिकांच्या मालिकेत प्रा.डॉ. तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचाही समावेश होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करायचे, तर ज्ञानार्जनाची आस, विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असे करता येईल. त्यांच्या जीवनाचा आलेख प्रेरणादायक आणि अचंबित करणारा ठरेल.

शेषाद्रींचा जन्म 3 फेब्रुवारी 1900 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीमधील (तामिळनाडूमधील) चेरा राजघराण्याशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेल्या कुलिथताई या गावात झाला. तिरुवेंगाडस अय्यंगार आणि नामगिरी अम्मल यांचे ते सुपुत्र. त्यांचे वडील शाळेत अध्यापन करीत. घराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. बालपणातील सद्गुणांची त्यांची शिदोरी त्यामुळेच समृद्ध झाली. तर्कशुद्ध विचारसरणीची आणि शिस्तबद्ध जीवनाची जडणघडण बालपणातच झाली.

गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना श्रीरंगमला पाठविण्यात आले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी तिरुचिरापल्लीच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रभक्तीने भारलेल्या संस्थापकांनी या महाविद्यालयाची स्थापना केली असल्याने शेषाद्रींवरही प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले.

नंतर त्यांनी बी.एस्सी. ऑनर्स पदवीसाठी तत्कालीन मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्ययन केले. त्या वेळी त्यांना विख्यात रसायनशास्त्रज्ञ प्रा. नारायण अय्यर आणि डॉ. बिमन बिहारी डे यांचे मार्गदर्शन लाभले आणि रसायनशास्त्राची गोडी निर्माण झाली. पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि सेंद्रिय रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. डे यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय औषधी वनस्पती व विशेषत: अनंतमूळ व कोरफड यावर संशोधन केले.

घरचे दारिद्य्र असल्यामुळे मद्रासमधील खर्चीक वास्तव्य परवडणारे नव्हते. त्यामुळे पुढच्या संशोधनात मोठी अडचण निर्माण झाली. त्यावर उपाय शोधताना त्यांना रामकृष्ण मिशनच्या स्टुडंट्स होमने आश्रय दिला. तेथे राहिल्यामुळे साध्या राहणीचे व शिस्तपालनाचे संस्कार झाले. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचे संतुलन साधण्याचे धडे मिळाले. या वास्तव्यात त्यांना एम.एस्सी. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले.

पदव्युत्तर शिक्षण व संशोधन…

1927 मध्ये प्रा. शेषाद्री यांना ‘ओव्हरसीज टेक्निकल स्कॉलरशिप’ने गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांना मँचेस्टर विद्यापीठामध्ये विख्यात सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाची संधी प्राप्त झाली. पुढे रॉबर्ट रॉबिन्सन यांना 1947 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. शेषाद्रींच्या संशोधनाचा विषय होता मलेेरिया प्रतिबंधक औषधे शोधणे आणि ‘अँथोसायनिन’चे संयुग तयार करणे. रॉबिन्सन यांच्यामुळे अन्य प्रख्यात वैज्ञानिकांशी त्यांंना संपर्क साधता आला.

डॉ. शेषाद्रींच्या साठाव्या वाढदिवसाच्या वेळी रॉबिन्सन यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची, संशोधक वृत्तीची आणि कार्यक्षमतेची खूप प्रशंसा केली. त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यापन कौशल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार प्रकट केले. त्या काळात शेषाद्री यांनी युरोेपमधील अनेक संशोधन संस्थांमध्येही संशोधन केले. 1929 मध्ये ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते डॉ. फ्रिट्ज प्रेगेल यांच्याबरोबर ‘ऑरगॅनिक मायक्रोअ‍ॅनालिसिस’ तंत्रावरही मोलाचे संशोधन केले.

1930 साली प्रा. शेषाद्री भारतात परतले. तो काळ प्रचंड धामधुमीचा होता. जुलमी ब्रिटिशांनी सर्वच क्षेत्रांत भारतीयांना धाकदडपशाहीने ठेवण्याचा आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला होता. अशा परिस्थितीत आपल्या पसंतीची संधी मिळविणे डॉ. शेषाद्रींना दुरापास्त झाले. तरीही अखेरीस त्यांना मद्रास विद्यापीठात संशोधनाची अधिछात्रवृत्ती मिळाली.

नंतर कोइंबतूरच्या कृषी संशोधन संस्थेत मृदाशास्त्र विभागात मोठी संधी मिळाली. यानंतर मात्र त्यांच्या सहनशक्तीची कसोटी पाहणार्‍या जबाबदार्‍यांना त्यांना सामोरे जावे लागले. आंध्र युनिव्हर्सिटीच्या नवीन सुरू होणार्‍या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुखपद त्यांना मिळाले. त्याची सर्वांगांनी उभारणी करणे हे फार मोठे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले. सुदैवाने त्यांना संस्थापक उपकुलगुरू सर सी.आर. रेड्डी आणि नंतरचे उपकुलगुुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मोलाची मदत केली. त्याच काळात दुसर्‍या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि ब्रिटिश राजवटीचे जुलूम वाढले.

डॉ. शेषाद्रींनी कष्टपूर्वक उभारलेल्या प्रयोगशाळांचा आणि शैक्षणिक सुविधांचा कब्जा ब्रिटिश लष्कराने घेतला. त्या ठिकाणी लष्करी इस्पितळाची उभारणी करण्यात आली. अशा परिस्थितीतच त्या विशाखापट्टणम शहरावर जपानी विमानांनी बाँब हल्ले केले. 482 किलोमीटर अंतरावरील गुुंटुर या ठिकाणी विद्यापीठाचे तातडीने स्थलांतर केले गेले. तात्पुरते मांडव उभे करून त्यात काम सुरू झाले. शिवाय दोन स्थानिक महाविद्यालयाच्या इमारतींचा आश्रय त्यासाठी घेण्यात आला. अर्थातच प्रयोगशाळेला लागणारी उपकरणे व रसायने यांचा आयात पुरवठा पूर्णत: थांबला. या कठीण परिस्थितीमध्येसुद्धा डॉ. शेषाद्रींनी संशोधन कार्य चालू ठेवले, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व डॉक्टरेट पदव्या प्राप्त करून दिल्या. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.

युद्धसमाप्तीनंतर विद्यापीठाने आपले काम पूर्ववत उभे करण्याचा आटोकाट प्रयत्न यशस्वी केला. 1949 मध्ये डॉ. शेषाद्री दिल्लीच्या दिल्ली विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून नियुक्त झाले. काही काळानंतर त्यांच्याकडे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्षपद चालत आले, परंतु ते स्वीकारायला त्यांनी नकार दिला. कारण त्यांच्या आवडत्या संशोधन आणि अध्यापन कार्यात त्यामुळे व्यत्यय आला असता. डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळविला.

अखंडितपणे 24 तास मिळणार्‍या सुविधांचा लाभ त्यांना प्रा. शेषाद्रींमुळे घेता आला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. यामुळे पुढे 1962 साली यूजीसीने त्यांच्या विभागाला अतिप्रगत संशोधन केंद्र म्हणून अधिकृतपणे सन्मानित केले. त्याचे नामकरण झाले ‘द अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर द केमिस्ट्री ऑफ नॅचरल प्रॉडक्ट्स’ आणि शेषाद्री त्याचे पहिले संचालक झाले.

1965 साली ते निवृत्त झाले, परंतु त्यांची गुणवत्ता श्रेणी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) म्हणून सन्माननीय नियुक्ती झाली. शेवटच्या निवृत्तीनंतर त्यांनी आपला प्रचंड ग्रंथसंग्रह दिल्ली विद्यापीठाला देणगी म्हणून दिला.

डॉ. शेषाद्री हे ज्येष्ठ वैज्ञानिक होते, तसेच आध्यात्मिक वृत्तीचेही होते. त्यांच्या मते केवळ विज्ञान विकास हा एकांगी ठरेल. त्याला आध्यात्मिक विचारांची व शिक्षणाची जोड पाहिजेच. त्यांनी त्यासाठी दिल्ली विद्यापीठात वेदान्त समितीची स्थापना केली. त्यासाठी त्यांना रामकृष्ण मिशनचा सहयोग मिळाला.

1962 साली डॉ. शेषाद्रींना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1966 साली प्रा. एन.व्ही. सुब्बाराव यांनी नोबेल पुरस्कारासाठी त्यांची शिफारस केली होती.


डॉ. शेषाद्री यांचे हे निष्ठावान वैज्ञानिकाचे व्यक्तिमत्त्व युवा पिढीला प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही. “Money and materials alone do not secure good research, they are only adjuncts and it is the human element behind them that matters” हे त्यांचे उद्गार अगदी अर्थपूर्ण आहेत.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

उद्या पहाटे चंद्र-ज्येष्ठा यांची दुर्मिळ पिधान युती

कल्पना चावला

17 मार्च 1962
1 फेब्रुवारी 2003

काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.

17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.

1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. त्याच विषयात त्यांनी 1988 मध्ये PhD पूर्ण केली.

हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर…

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली. नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.

नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.

त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.

नोव्हेंबर 1996मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.

शेवटी तो दिवस उजडलला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.

एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.

कल्पना यांचा शेवटचा प्रवास….
नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.

जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.

1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.

त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.

22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.

तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.

ज्या दिवशी कल्पना चावला अंतराळात गेली, त्याच दिवशी तिचा मृत्यू होणार होता हे नासाला माहित होतं. केवळ कल्पनाच नाही, तर तिच्यासोबत असलेल्या 7 प्रवाशांच्या अंताचा अलार्मही डिस्कव्हरी फ्लाइटने वाजवला होता.

1 फेब्रुवारीचा दिवस जगातील अंतराळ शास्त्रज्ञांच्या हृदयात एक दुःख वेदना बनली आहे. 1 फेब्रुवारी 2003 रोजी यूएस स्पेस शटल कोलंबिया हे अंतराळ मोहीम संपवून पृथ्वीच्या वातावरणात परतत असताना क्रॅश झाले आणि त्यात सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. या अपघातात भारताच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचाही मृत्यू झाला होता. मात्र, कल्पना चावलासह सर्व अंतराळवीरांचा मृत्यू होणार आहे, हे नासाला आधीच माहिती होतं. तरीही त्यांनी याची माहिती का दिली नाही

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट