नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
झाले बहु होतीलही बहु! परी या सम हा!
खगोल भौतिकी इतिहासात आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात मेघना साहा यांचे स्थान अद्वितीय आहे,हे कौतुकाचे बोल आहेत नोबेल पुरस्कार विजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे.
यांचा जन्म बांगलादेशातील ढाका या जिल्ह्यातील सेओरातली या गावात झाला. वडील जगन्नाथ साहा आणि आई भुवनेश्वरी देवी यांचे ते पाचवे अपत्य, ते किराणा दुकान चालवायचे आणि आपल्या भल्या मोठ्या परिवाराचे पालन पोषण करायचे.तुटपूंज्या पैशात आपल्या मुलांना शिकविण्याची त्यांची क्षमता नव्हती.त्यामुळे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणाच्या नावाने एक मोठे प्रश्नचिन्ह साहा तयांच्यासमोर होते. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी दहा किलोमीटर सिमुलिया या गावी जावे लागणार होते.
जाण्या येण्याचा खर्च देखील आई-वडील करू शकत नव्हते.पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग झाले तर मेघनाथ यांचे ज्येष्ठ बंधू जैनाथ एक जूट कंपनीत काम करायचे, त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर होते अनंत कुमार दास यांच्या मदतीने पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होणार होता. डॉक्टर खूप चांगले होते ,त्यांनी मेघनाथला आपल्या घरी ठेवून घेतले राहणे व खाणे ही तर व्यवस्था झालीच पण मेघनाथला घरातील लहान-मोठी कामे करावी लागायची, गाईचा गोठा स्वच्छ ठेवणे,भांडी घासणे, अशी कामे करून त्यांनी शिक्षण चालू ठेवले. मनापासून अभ्यास केला आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. शिवाय त्यांना दर महिन्याला चार रुपये शिष्यवृत्ती पण मिळू लागली.
त्यानंतर 1905 साली साहा यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका येथील विद्यालयात प्रवेश मिळवला. 1905 हे वर्ष फार महत्त्वाचे मानले जाते कारण भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली. सगळीकडे संघर्ष, हिंसाचार, अशांतता असे वातावरण होते. विद्यालयावर पण घटनेचा परिणाम झाला आणि मेघना साहा यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढून टाकण्यात आले. साहा यांच्यावर जणू आभाळच कोसळले.पण संकटांना घाबरणाऱ्यापैकी ते नव्हते “केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे” या युक्तीप्रमाणे ते पुन्हा शिक्षणासाठी वन वन फिरू लागले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. किशोरीलाल जुबली विद्यालयात त्यांना शिष्यवृत्ती सहप्रवेश मिळाला. गणित आणि इतिहास हे दोन विषय त्यांना खूप आवडायचे. त्यांचे वाचनही भरपूर होते रवींद्रनाथ टागोर, मधुसूदन दत्त आहे त्यांचे आवडते लेखक.
1909 साली त्यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे 1911साली कलकत्ता विद्यालयाची इंटरमीडिएट परीक्षा पास करून रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्यावेळी सत्येंद्रनाथ बसू त्यांचे सहाध्यायी होते.भारतीय सांख्यिकी संस्थांचे संस्थापक प्रशांतचंद्र त्यांचे सीनियर होते.प्रफुल्लचंद्र राय त्यांना रसायनशास्त्र शिकवत तर जगदीश चंद्र बसू भौतिकशास्त्र.. शिकवायचे.1913 साली मेघनाथ यांनी गणित विषय घेऊन बीएससी आणि 1915 मध्ये एम एस सी परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे 1913 साली गणित विभागाचे रुजू झाले. पण एका वर्षात त्यांना भौतिकशास्त्र विभागात स्थलांतरित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील द्रव स्यैतीकी, स्पेक्ट्रामिकी आणि उष्णगतीकी थर्मो डायनामिक्स यासारख्या विषयावर व्याख्यान द्यायला त्यांनी सुरुवात केली.त्यातच त्यांनी तापीक आयननचा सिद्धांत सादर केला. 1918 साली कलकत्ता विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही पदवी मिळवण्यासाठी विकिरण दाब रेडिएशन प्रेशर आणि विद्युत चुंबकीय विकीरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यावर आपले संशोधन त्यांनी सादर केले.
त्यानंतर ते दोन वर्षे विदेशात गेले.दोन वर्ष युरोप व नंतर बर्लिन 1921 ला पुन्हा मायदेशी परतले.1923 साली साहा अलाहाबाद येथील विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात कार्यरत होते. सांख्यिकीय यांत्रिकी स्टॅटिकल मेकॅनिक्स, परमाणु आणि आण्विक स्पेक्ट्रामीकी अटोमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोमेट्री ,ऋर्णविद्युत तत्त्वांची इलेक्ट्रॉन बंधुता, अणूंचे उच्चताप नियोजन, आयन मंडळातील रेडिओ लहरी,इत्यादी त्यांच्या या संशोधनपर कार्याचे देशातील तरुणांना आकर्षित केले.
अलाहाबाद शहरात साहा यांचे पहिले पुस्तक’ ए टेक्स्ट बुक ऑफ हिट’ हे प्रकाशित झाले. या विषयावर प्रशिक्षण देणारे ते पहिले भारती होते . एस एन बसू यांच्यासोबत साहा यांनी आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांत या विषयावरील लेखाचा जर्मनीतून इंग्रजी भाषेत अनुवाद केला व पुस्तक प्रकाशित केले.ते काही काळ राष्ट्रीय योजना समितीचे सक्रिय सदस्य होते.भारतीय संसदेत त्यांनी निर्वाचित निर्दय सदस्य देखील होते. 1930 साली अलाहाबाद येथे उत्तर प्रदेश विज्ञान अकादमीची स्थापना त्यांनी केली. राष्ट्रीय विज्ञान अकामी म्हणून आजही संस्था कार्यरत आहे. 1933 आली त्यांनी कलकत्ता येथे भारतीय भौतिकी सोसायटीची स्थापना केली. 1970 मध्ये या संस्थेचे नामकरण आय एन एस ए अर्थात राष्ट्रीय भारतीय विज्ञान अकादमी असे करण्यात आले. विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी इंडियन सायन्स न्यूज असोसिएशनची स्थापना 1935 मध्ये केली. त्यात त्यांनी जवळपास 200 पेक्षा जास्त लेख लिहून प्रकाशित केले.
16 फेब्रुवारी 1956 रोजी नवी दिल्ली येथे योजना आयोग या आपल्या कार्यालयात जात असताना हृदविकाराच्या धक्क्याने हा वैज्ञानिक काळाने हिरावून नेला. साहा यांचे जीवन म्हणजे केवळ समर्पण होय त्यांची दूरदृष्टी त्यांचा अभ्यास संशोधन म्हणजे देशाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे .अशा या थोर शास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा.झाले बहु होतील ही बहु परी या सम हा!
संकलन- डॉ. बी व्ही लिंबाळकर
शब्दांकन- सुचिता खनगई विज्ञान सेनानी
