निसर्ग आपल्याला विविध नैसर्गिक कृतीतून अवाक करत असतो. आपण म्हणतो की आपली सावली आपली साथ सोडून जाऊ शकत नाही. पण हे सत्य नाही. वर्षभरात असे दोन दिवस असतात ज्या वेळेत दुपारी काही क्षणा साठी आपली सावली आपली साथ सोडून जाते. त्या दिवसांना शून्य सावलीचा दिवस अर्थातच झिरो शॅडो डे अस संबोधलं जाते. दरम्यान परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी तर्फे सुद्धा ह्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आवाहन करण्यात आले, ज्यास परभणीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन शून्य सावलीचे विविध प्रयोग केले.
ह्या झिरो शॅडो डेच्या शुन्य सावली दिनाच्या दिवशी सुर्य आपल्या डोक्याच्या एकदम वर येत असल्याने आपणास आपली सावली दिसेनाशी होते.यालाच बिनासावलीचा दिवस असे देखील म्हटले जाते. वर्षातील खुप ठाराविक एक दोन दिवस आहे जेव्हा हा शुन्य सावलीचा अनुभव आपणास येत असतो.
आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते.
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.

महाराष्ट्रातील विविध शहरे यांचे अक्षांश वेग वेगळे असल्या कारणाने विविध ठिकाणी शून्य सावलीची वेळ आणि दिनांक वेगळा असू शकतो.त्यामुळे दुपारी 12 ते 12.35 वेळेमध्ये आपण शुन्य सावली दिवस अनुभवू शकतो. शहरे आणि शून्य सावली ची वेळ : परभणी – 12.19 मि., नांदेड – 12.17 मि., छ. संभाजीनगर – 12.25 मि., बीड- 12.23 मि., लातुर- 12.20 मि., हिंगोली-12.18 मि., धाराशिव- 12.22 मि., जालना – 12.23 मि.
पासच्या आवाहनास वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू श्री. इंद्र मनी ह्यांनी सुद्धा प्रतिसाद देत, शून्य सावली प्रयोग अनुभवले. त्यावेळी त्यांनी पास च्या विज्ञान चळवळ विषयी सदिच्छा व्यक्त केल्या. प्रस्थावित परभणी विज्ञान संकुल परिसरात देखील शून्य सावली दिन विविध प्रयोगाच्या मार्फत साजरा केला गेला.