+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

इसवी सन पूर्व सहावे शतक, आर्यवृत्तातील प्रयाग तीर्थक्षेत्र, येथे मुनी सोमशर्मा यांना राजप्रतिनिधी पेक्षा जास्त मान होता. कश्यपा नावाचा” आलुक्य” म्हणून ख्याती असणारा त्यांचा शिष्य. धान्याचे कण गोळा करताना सोमशर्मांना प्रयाग सारख्या समृद्ध नगरात कश्यपा दिसला. तेव्हा त्यांनी त्यांना कश्यपाऐवजी कणाद असे नाव दिले. कणाकणाचे विश्वज्ञान मिळवणारा, मूलभूत ज्ञानाचा प्रस्थापक.
“सदैव शंकाकुल राहावे” असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला. गृहगती,नक्षत्रगती, ध्रुवाची जागा,सप्तऋषींचे भ्रमण, ताऱ्यांची उत्पत्ती आणि नाश हे सारे नियमित चालू आहे. आपल्या दैनंदिन, जीवन व्यवहार आणि जीवन व्यापार यात सुद्धा तर्कशुद्ध घडामोडी चालू असतात.पण आजार, नुकसान, अपयश इत्यादीकडे व्यवहारिक दृष्ट्या आपण बघत असल्याने “जगात काही नियम नाही” सारे असंबंध आहे, असे आपण अनुमान काढतो. पण प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण शक्य आहे, असे दिसून येते. तेव्हा अन्यवस्था, अंदाधुंदी असे सृष्टीचे, जगाचे स्वरूप वाटणे, हा आपल्या संकुचित दृष्टीचा दोष आहे. सृष्टी, विश्व हे नियमबद्ध आहेत. विश्वाची ढोबळमानाने सहा वर्गात वर्गवारी करता येते. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय म्हणजे वस्तू. त्यांनी पदार्थाचे उपवर्गीकरण नऊ रूपात केले. क्षिती, आव, तेज, वायू, आकाश, काल, दिक, मन आणि आत्मन. पदार्थाचे पंचंद्रीयांना जास्त सहज ज्ञान होणारे गुणविशेष म्हणजे गंध, स्पर्श आणि ध्वनी हे आहेत. पहिले चार हे चार प्रकारच्या कणांनी तयार झालेले आहेत. या कणांचे स्वरूप मूलभूत आहे. वस्तू कणांची बनली आहे. विश्वकनमय आहे. या कणांनाच मी “परमाणु” असे म्हणतो. असे कणाद म्हणतात. परमाणु अमर आहेत.
विश्वाचे वैशेशिक तत्त्वज्ञान( वैशेषिक सूत्र) या ग्रंथात त्यांनी हे सगळे लिहून ठेवले आहे. पुढे त्यांनी वस्तूचे चोवीस गुणविशेष सांगितले रंग, रुचि, गंध ,स्पर्श, ध्वनी, अंक, संख्या, भिनत्व, संयुकत्व, विभागित्व, दूरत्व, संनिध्यात्व, प्रवाहित्व, प्रवाहारोधकत्व, जाणीवत्त्व, सोख्य, दुःख, इच्छा, निरीच्छा, लालसा, जडत्व, वृत्ती ,गुण, अवगुण हे ते गुणविशेष. पंचमहाभूते आणि काल अवकाश, मन आणि आत्मा या वर्गात वस्तूचे जास्त तपशील वर्गीकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी परमाणुच्या संयोगाचा पद्धतशीर अभ्यास केला. रासायनिक बदलाच्या बाबतीत उष्णतेचा हात असतो हे त्यांनी सहप्रमाण मांडले. रेणू ही रासायनिकरित्या संयुक्त होतात असे त्यांनी प्रतिपादन केले. प्राचीन भारतीय वैज्ञानिक कनाद हाच,अणु सिद्धांताचा आद्य जनक हे आधुनिक पाश्चात्य वैज्ञानिकांनीही मान्य केले…….
प्राचीन भातीय शास्त्रज्ञ आणि संशोधक
प्रा.भालका केळकर
संकलन…
डॉ.बाहुबली लिंबाळकर
9834393018