
दिनांक 31/3 /2013
इंटरनॅशनल सायन्स पार्क परभणी , येथे परभणी अस्त्रोनोमिकल सोसायटी च्या वतीने श्री भानुदास बाबासाहेब कवडे, राहणार पांढरगळा ,तालुका जिंतूर जिल्हा परभणी, यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे तांत्रिक सहाय्यक वर्ग दोनच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
भानुदास ने आपला प्रवास सांगत असताना ह्या प्रवासात त्याला बऱ्याचशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच घ्यावे लागले घरची हालाखीची परिस्थिती शेतकरी कुटुंब कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा मार्गदर्शक नसताना त्याने जे पुढे आले त्याला आपलंसं करून हा प्रवास पूर्ण केला बऱ्याचदा वडिलांना बाहेरगावी जायचं असेल तर भानुदास ला आपल्या शेतातील दोन बैलांना सांभाळण्यासाठी शेतात जावं लागत असे.
कशीबशी दहावी पास झाल्यानंतर अकरावी मध्ये जिंतूर या ठिकाणी कॉलेजला सायन्स फॅकल्टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला तिथे सायन्स ची स्पेलिंग न आल्यामुळे त्याला अकरावी सायन्स ला प्रवेश मिळाला नाही, पण कोणीतरी पॉलिटेक्निक बद्दल सांगितले, की पॉलिटेक्निक केल्यामुळे कंपनीमध्ये नौकरी मिळेल व आपला प्रपंच चालेल, म्हणून त्याने सेलू येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला.
सर्व काही इंग्रजी भाषेत असल्यामुळे प्रथम वर्षात त्याची फक्त गणित या विषयामध्ये तो पास झाला . केमिस्ट्री, फिजिक्स सारखे सर्वच विषय हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते विषय पूर्ण बॅक राहिले, मग पहिल्या टर्म चे विषय दुसऱ्या टर्मला दुसऱ्या टर्मचे तिसऱ्या टर्म असे करत करत तीन वर्षाचे पॉलिटेक्निक तीन वर्षातच पूर्ण करण्यात भानुदास ला यश मिळाले .
नंतर इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळतं आणि इंजिनिअरिंगची डिग्री मिळून आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो ह्या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केले. पण घरच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस इंजिनिअरिंगची फीस भरू न शिकल्यामुळे त्याने आपल्याकडे असलेल्या शेतीवर एज्युकेशन लोन मिळून, संभाजीनगर येथे कॉलेजला प्रवेश मिळवला. त्यावेळेस त्याच्यासोबत चांगलं मार्गदर्शन व चांगल्या कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी हुशार विद्यार्थी होते या सगळ्यांमध्ये प्रचंड मेहनत करून इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली.
इंजिनिअरिंग झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करून कंपनी जॉब मिळेल.पण कंपनीत जॉब मिळत नव्हता म्हणून एम. टेक. करत असताना स्टाय फंड मिळतो म्हणून त्याने पुणे येथे एम. टेक. ला प्रवेश घेतला .प्रवेश मिळण्यासाठी गेट सारखी परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेसाठी कोचिंग हैदराबाद दिल्ली पुणे मोठ्या शहरामध्येच होते, मग त्याने हैदराबाद येथील एका कोचिंग क्लासेसचे पोस्टल स्टडी मटेरियल मागून घेऊन सेल्फ स्टडी करून ऍडमिशन मिळवले.
पुण्यासारख्या ठिकाणी बारा हजार चारशे रुपये मध्ये महिना घालवला व अभ्यास केला त्यानंतर कोविड आल्यामुळे गावी परत यावे लागले. गावी एक वर्ष पूर्णपणे शेतात काम केले आणि एक वर्षानंतर त्याला त्याच्या पीजी चा प्रोजेक्ट व पीजी पूर्ण करण्यासाठी तो परत पुण्याला गेला आणि तेथे पूर्ण अभ्यास करून पी. जी. पूर्ण केले , पीजी चा अभ्यास करत असतानाच स्पर्धा परीक्षा मध्ये लागण्यासाठी स्पर्धा परीक्षा चा पण अभ्यास चालू ठेवला.
2023 मध्ये इस्रो ची जाहिरात आली आणि त्यांची परीक्षा देऊन चांगल्या पद्धतीत भारतामधून सातव्या क्रमांक घेऊन पास झाला…..
आज व्यवस्थेच्या उणीवेचीच जाणीव, जणू भानुदासाची प्रेरणा बनली आणि भानुदास इस्रो कडे झेपावला………

Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter is palpable, and it’s clear that you pour your heart and soul into every post. Keep up the incredible work!