+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

फिरत्या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रयोगांचा अनुभव!

विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘विज्ञान वाहिनी’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित झालेली बस पुणे येथे एका कार्यक्रमात बुधवारी (दि.13) परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरीत करण्यात आली, त्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ प्रताप पाटील उपस्थित होते.

विज्ञान वाहिनी (Science Lab On Wheels) ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा असून बसमधून उपकरणांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्यविकास साधला जाणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला आहे. विकासापासून खूप मागे असलेल्या मुलांना या उपक्रमातून विज्ञानाचे दालन खुले होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला जाणार आहे. या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह विज्ञानाचे धडे मिळणार आहेत. एका मोठ्या बसमध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची साधने ठेवून ही प्रयोगशाळा थेट शाळांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ही सुविधा उपलब्ध झाली असून, यासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त मा राजकुमार चोरडिया, विश्वस्त मा प्रदीप चोरडिया, मा विशाल चोरडिया, मा आनंद चोरडिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. श्री गिरीश क्षीरसागर व श्री पोपटराव काळे यांच्या समन्वयातून ही फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे.

सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलातील सभागृहात फिरती प्रयोगशाळा उद्घाटनाचा तथा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ श्री.भानुदास कवडे, प्रवीण मसालेवाले ट्रस्ट बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री राजकुमार चोरडिया, वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.

उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व

या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि २१ व्या शतकातील जीवनकौशल्ये विकसित करणे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगणे, कोडींग आणि प्रोग्रामिंगची ओळख करून देणे, तसेच सहयोग आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला आहे.

फिरत्या प्रयोगशाळेची रचना

फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही एक विशेष सुसज्ज बस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक उपकरणे, प्रोग्रामिंग साधने आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध आहे. ही बस थेट शाळांच्या आवारात पोहोचून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देईल. एका वेळी २० विद्यार्थ्यांना या बसमध्ये प्रवेश दिला जातो, आणि तासभराच्या सत्रात त्यांना उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळते. ही बस प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, हडपसर, पुणेच्या सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी लाभ

 फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सहावी आणि त्यापुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजण्याची व स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उपकरणांचे कार्य आणि वैज्ञानिक तत्त्वे समजतील. यात व्यवहार विज्ञान व नवलाईचे प्रयोग तसेच फिरते तारांगण देखील या बसमध्ये आहे.

याशिवाय, कोडींग आणि प्रोग्रामिंगची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्यांच्यात तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्यांच्यात सहयोग, नाविन्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्यांना अशा सुविधा सहसा उपलब्ध नसतात, या उपक्रमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन विज्ञान संवादक (सायन्स कम्युनिकेटर) नेमले असून त्यात चालकाचा देखील समावेश आहे.

प्रवीण मसाले ट्रस्टच्या सहकार्याने फिरत्या प्रयोगशाळेची व्यवस्था केली आहे. हा उपक्रम १५ वर्षे चालणार आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विस्तारित केला जाईल. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वय साधून प्रत्येक शाळेत बसच्या भेटीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

गेल्या पंधराहून अधिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी सहजसोपे विज्ञान अनुभवले असून, आज ही मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित कार्यशाळाही संस्थेतर्फे घेण्यात येत आहेत.

या फिरत्या विज्ञान वाहिनीचा , परिसरातील सर्व विद्यार्थी सर्व शाळा यांनी याचा लाभ सर्व लाभार्थी विद्यार्थांना व्हावा या साठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडे सर्व इच्छुकानी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन सोसायटी तर्फे करत आहे.

अवकाशातील एक तेजस्वी तारा निखळला

अवकाशातील एक तेजस्वी तारा निखळला

भावपूर्ण श्रद्धांजली!!!

२० मे २०२५, परभणी

पद्मविभूषण प्रो जयंत विष्णु नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलभौतिकिशास्त्रज्ञ होते. तसेच ते उत्तम विज्ञान प्रसारक – सुधारक होते.
१९८८ मधे त्यानी IUCAA ची ,म्हणजे आंतरविद्यापीठिय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्र ची TIFR मधे असताना स्थापना केली . ते IUCAA चे संस्थापक संचालक होते.
बनारस विश्व विद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर, परदेशात केम्ब्रिज विद्यापीठत ते शिकले. प्रो फ़्रेड होयल हे त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक होते, त्यांच्या सोबत त्यानी विश्वाच्या निर्मितिचा सिद्धांत मांडला त्याला च होइल- नारलीकर सिद्धांत असे सम्बोधतात. तो सिद्धांत आइंस्टाइनच्या सिद्धांतशी समांतर होता.

परभणी तून , परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसाइटी तर्फे , दरवर्षी होत असलेल्या विज्ञानवारी च्या IUCAA प्रवासात , पुणे IUCAA त, “आस्क द सायंटीस्ट”
या सदरात प्रो जयंत नारळीकर हे स्वतः परभानीतील मुलांच्या प्रश्नाला उत्तर देत.
या वर्षी त्यानी मूलांसाठी गणित या विषयवार विशेष व्याख्यान राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित घेतले होते.
परभानीतील होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलची ते प्रेरणास्रोत आहेत.

तंजावर येथील राष्ट्रीय परिषदेत प्रसाद वाघमारे यांचा संशोधनपर प्रबंधपत्र सादर

तंजावर येथील राष्ट्रीय परिषदेत प्रसाद वाघमारे यांचा संशोधनपर प्रबंधपत्र सादर

5.01.2025

परभणी येथील गणित अभ्यासक व परभणी सोसायटी चे सहसचिव प्रसाद वाघमारे यांनी तंजावर(तामिळनाडू) येथील राष्ट्रीय परिषदेत प्राचीन गणित विषयावरील संशोधनपर प्रबंधपत्र सादर केले.


त्यांच्यावर येथील शास्त्र विद्यापीठामध्ये दिनांक 23, 24 व 25 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये चतुर्थ विश्व वेद विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ राज राजन ,डायरेक्टर इस्रो यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी एकूण 18 वेगवेगळ्या विषयातील अभ्यासकांनी त्यांचे संशोधन सादर केले व सखोल अशी चर्चा या विषयांवर करण्यात आली.

त्यात प्राचीन गणित विषयात प्रसाद वाघमारे यांनी महान गणितज्ञ श्री भास्कराचार्य यांच्या लीलावती या पुस्तकावरील ‘Bhaskaracharya’s Lilavati: A Pillar of Ancient Indian Mathematics’ या विषयावर आपला प्रबंधपत्र व पोस्टरचे सादरीकरण केले. त्यात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या श्लोकांमधील गणित हे सध्याच्या अभ्यासक्रमात कसे पूरक आहे याबद्दल प्रबंधपत्रात सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी ‘भारतीय विज्ञानाची उज्वल परंपरा’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक श्री सुरेशजी सोनी, व्यवस्थापकीय संचालक श्री शिवकुमार शर्मा, भारतीय ज्ञानपद्धती तथा इंडियन नॉलेज सिस्टीम (IKS) चे राष्ट्रीय समन्वयक प्रा गंटी एस एन मूर्ती आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सादरीकरणास मान्यता मिळून हा संशोधन पर पेपर यूजीसी अंतर्गत संशोधन पुस्तिकेत छापून येणार आहे. या यशाबद्दल प्रसाद वाघमारे यांचे आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणीचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, मित्र व विद्यार्थी आदींनी अभिनंदन केले.

रतन नवल टाटा

रतन नवल टाटा

जोडोनीया धन उत्तम व्यवहारे |
उदास विचारे वेच करी ||१||
उत्तमची गती तो एक पावेल |
उत्तम भोगील जीव खाणी ||२||
शांतीरूपे नोव्हे कोणाचा वाईट |
वाढवी महत्त्व वडीलांचे ||३||
तुका म्हणे हें चि आश्रमाचे फळ |
परमपद बळ वैराग्याचे ||४||

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी व्यक्त केल्या प्रमाणे आयुष्य जगलेला आधुनिक काळातील एक महान देशभक्त.

जन्म २८ डिसेंबर १९३७
निधन- ९ ऑक्टोंबर २०२४

रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र होते, ज्यांना जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते, ते टाटा समूहाचे संस्थापक होते.

त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून आर्किटेक्चर मध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली ते १९६१ मध्ये टाटा मध्ये रुजू झाले, जिथे त्यांनी टाटा स्टीलच्या दुकानात काम केले. नंतर ते जे.आर.डी. टाटा यांच्या निवृत्तीनंतर टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून १९९१ मध्ये उत्तराधिकारी बनले.

१९९६ मध्ये, त्यांनी टाटा टेलि सर्व्हिसेस ही समूहाची दूरसंचार कंपनी सुरू केली आणि २००४ मध्ये त्यांनी समूहाची आयटी शाखा असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चा IPO सुरू केला. २०१२ मध्ये पायउतार झाल्यानंतरही, त्यांनी टाटा सन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्स सह अनेक टाटा कंपन्यांचे मानद अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस यांचे अधिग्रहण केले, ज्यामुळे टाटा मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्रित समूहातून जागतिक व्यवसायात बदलला.

रतन टाटा हे जगातील सर्वात मोठ्या परोपकारी लोकांपैकी एक होते, त्यांनी त्यांच्या मिळकती तील सुमारे ६०-६५% धर्मादाय संस्थांना दान केले होते.

टाटा देखील एक विपुल गुंतवणूकदार होते आणि त्यांनी अनेक स्टार्ट अप्स मध्ये असंख्य गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी आजपर्यंत ३० हून अधिक स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे, बहुतेक वैयक्तिक क्षमतेने आणि काही त्यांच्या गुंतवणूक कंपनीद्वारे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहां पैकी एक असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

आंतरराष्ट्रिय विज्ञान संकुलात वृक्ष दिंडी चे उत्साहात आयोजन

आंतरराष्ट्रिय विज्ञान संकुलात वृक्ष दिंडी चे उत्साहात आयोजन

दिनांक 17.07.2024

आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परिसर येथे वृक्षदिंडी चे परभणी अस्त्रोनॉमिकल सोसायटी व वृक्षवल्ली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते.
वृक्षदिंडी ची सुरुवात , विज्ञान चौक – राजगोपालचारी उद्यान पासून होऊन त्याचा शेवट आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परिसर येथे झाला.


वृक्षदिंडीमध्ये साधारणपणे 500 पेक्षाही अधिक विद्यार्थी , तसेच पालक आणि शिक्षक संमीलित झाले, यादरम्यान बालगोपाल वारकऱ्यांनी पावली खेळत तसेच पथनाट्य सादरीकरण करत, अभंग गात वृक्षदिंडी मध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी , तसेच जिल्ह्याचे अप्पर पोलीस निरीक्षक श्री यशवंत जी काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या प्रसंगी बोलताना डॉक्टर पी. आर. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या निर्मितीबाबत माहिती दिली, तद्वतच वृक्षवल्ली फाउंडेशनचे डॉक्टर देवानंद ओमनवार यांनी ” एक पेड मां के नाम ” असा नारा देत वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले , तसेच अप्पर पोलीस निरीक्षक यशवंत काळे यांनी वातावरणातील बदलासाठी वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये वृक्ष संगोपन याबद्दल विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
वृक्षदिंडी साठी शहरातील नामवंत शाळा उपस्थित होत्या त्यामध्ये ऍकमे इंग्लिश स्कूल , ज्योतिर्गमय स्कूल , सारंग स्वामी विद्यालय, संस्कृती विद्यालय, बळीराजा विद्यालय, या अग्र स्थानी होत्या.

वृक्षदिंडीमध्ये शहरातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये पोलिस उप अधीक्षक श्री दिगंबर डंबाळे, डॉ नेहरकर, डॉ कातनेश्र्वरकर, डॉ कलकोटे, डॉ. केदार खटिंग, डॉ आनंद अनेराव, डॉ आनंद लाड, डॉ सौ मानवतकर, श्री अनुप शुक्ल, डॉ. भोसले , डॉ. राजेश मंत्री , डॉ. बंगाळे, श्री आशिष निलावार , श्री प्रशांत कायांदे, श्री पवन देशमुख, श्री कल्याण देशमुख.

तसेच सौ अंजली बाबर, सौ प्रिया ठाकुर, सौ. सूर्यवंशी, श्री. अक्षय देसरडा, श्री नारायण निलंगे, श्री ज्ञानेश्वर जोगदंड, श्री. पेडगावकर, सौ कमल पाटिल, सौ डॉ निरस, डॉ निखिल केंद्रेकर, सौ घोडे, सौ पोटेकर, श्री कृष्णा झरकर, श्री नितिन फुटाणे,श्री नागेश वाईकर, श्री. सुभाष जाधव, श्री कल्याण भारोसे, श्री प्रसन्न भावसार, श्री बंडेवार श्री लिंगायत , श्री मजीद भाई.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी अस्ट्रॉनोमिकल सोसायटी च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

दिनांक 22.06.2024

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर दिनांक 17जुन ते 20 जुन दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

त्यात पहिल्या दिवशी , उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे श्री बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती लाभली, तसेच विनोदराय इंडस्ट्रीचे श्री सुनिल जी रायथट्टा यांनी करियर इन इंजिनीअरिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच भूगर्भ शास्त्र विषयी श्री अमर कच्छवे यांनी विचार मांडले. तद्नंतर श्री पार्थ दराडे यांनी खगोशास्त्र या विषया बद्दल माहिती दिली, तसेच श्री ॲड दराडे यांनी विधी व न्याय या विषयी विचार मांडले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मैसूर येथून आलेल्या डॉ शाम गरुड यांनी अन्न तंत्रज्ञान या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. जगप्रसिद्ध तैल चित्रकार श्री शिवराज जगताप यांनी मुलांना कला क्षेत्र या विषयातील संधी या वर मार्गदर्शन केले. तद्वतच श्री अनुप जी शुक्ल यांनी वाणिज्य क्षेत्रा विषयी च्या जागतिक संधी या बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री तरवटे यांनी तंत्रविद्या निकेतन तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आभयासक्रम या विषयी ओहपोह केला. श्री संदीप राजपुरे यांनी मुलांना प्रशासकीय सेवे तील उपलब्ध संधी या बद्दल सखोल विवेचन केले.

तिसऱ्या दिवशी श्री कर्नल समीर गुज्जर यांनी राष्ट्रिय सैन्य दलातील सेवेच्या बद्दल मार्गदर्शन केले. तद्नंतर रसायशास्त्र या विषयातील ज्येष्ठ प्रा. भीमराव खाडे यांनी मुलांना मूलभूत व्याज्ञाना सोबतच रसायनशास्त्र या विषयावर सखोल विवेचन केले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ प्रा. श्री रोहिदास नितोंडे यांनी साहित्य भाषा आणि लेखन या क्षेत्रा विषयी विचार मांडले. भारतीय डाक विभागाकडून श्री कुलकर्णी यांनी मुलांना माहिती दिली. श्री संग्राम देशपांडे यांनी क्वांटंम मेकॅनिकस् या विषयावर अधिक माहिती दिली.

शिबियाच्या चौथ्या दिवशी, श्री आनंद नागरगोजे यांनी पदार्थ विज्ञान या विषयातील संधी या बद्दल सविस्तर तपशील दिला. प्रसिध्द मनोविकार तज्ञ डॉ जगदीश नाईक यांनी करियर मधील ताण तणाव व त्या वरील उपाय या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. तद्वतच श्री मंगेश मुंदडा यांनी अन्न प्रक्रिया व उद्योग या विषयावर सखोल विवेचन केले. श्री उर्जीत भावसार आणि श्री सम्यक घोडके यांनी त्यांच्या सक्सेस स्टोरी बद्दल कथन केले.

शिबिराचि सांगता सामजिक कार्यकर्त्या तसेच जागतिक कचरा वेचक संगठना उपाअध्यक्ष श्रीमती सुशीला विठ्ठलराव साबळे याच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली, त्या प्रसंगी श्रीमती प्रिया ठाकुर उपस्थीत होत्या.

शिबिराच्या यशस्वीेतेसाठी जिल्ह्यातून सर्व शाळेचा सहभाग लाभला, तसेच परभणी अस्त्रोनोमिकॅल सोसायटीत च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .