डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक होते. डॉ.नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै१९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. “स्थिर स्थिती सिद्धान्त”
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने ‘व्याख्यानबाजी’ असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे..
विज्ञानकथा पुस्तके संपादन
अंतराळातील भस्मासुर
अंतराळातील स्फोट
अभयारण्य
चला जाऊ अवकाश सफरीला
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस
अंतराळ आणि विज्ञान
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
विश्वाची रचना
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे
विज्ञानाची गरुडझेप
विज्ञानाचे रचयिते
समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक)
Seven Wonders Of The Cosmos
सूर्याचा प्रकोप. त्याचबरोबर
आत्मचरित्र
“चार नगरांतले माझे विश्व”याचे पण लिखाण त्यांनी केले….
नारळीकर यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट मिळाली आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी
२००४ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. याआधी, १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले होते.
१९८१ मध्ये त्यांना इचलकरंजी येथील एफआयई फाउंडेशनने ‘राष्ट्र भूषण’ प्रदान केले होते.
त्यांना २०१० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
त्यांना भटनागर पुरस्कार , एमपी बिर्ला पुरस्कार आणि सोसायटी अॅस्ट्रोनॉमिक डी फ्रान्स (फ्रेंच अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी) चे प्रिक्स ज्यूल्स जॅन्सेन हे पुरस्कार मिळाले आहेत . ते लंडनच्या रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे असोसिएट आणि तीन इंडियन नॅशनल सायन्स अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत. त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाव्यतिरिक्त, नारळीकर हे त्यांच्या पुस्तके, लेख आणि रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे विज्ञानाचे संवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रयत्नांसाठी, त्यांना १९९६ मध्ये युनेस्कोने कलिंग पुरस्काराने सन्मानित केले.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्ल सागन यांच्या कॉसमॉस: अ पर्सनल व्हॉयेज या टीव्ही शोमध्ये ते वैशिष्ट्यीकृत झाले होते. १९८९ मध्ये, त्यांना केंद्रीय हिंदी संचालनालयाकडून आत्माराम पुरस्कार मिळाला.
त्यांना १९९० मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला.
त्यांनी २००९ मध्ये इन्फोसिस पुरस्कारासाठी भौतिक विज्ञान ज्युरीमध्येही काम केले.
२०१४ मध्ये, त्यांना त्यांच्या मराठीतील आत्मचरित्र, चार नागरांतले भूलभुलैया विश्वासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
आपले संपूर्ण जीवन खगोलशास्त्र .गणित आणि विज्ञानाला समर्पित करणारे असे आदरणीय जयंत नारळीकर यांनी जगाच्या नकाशावर भारतात चे नाव तेजोमय केले. असा हा तारा दिनांक 20 मे 2025 रोजी आकाशामध्ये सदैव चमकण्यासाठी आपल्या सर्वातून निघून गेला............
संदर्भ - इंटरनेट
संकलन- डॉ बाहुबली लिंबालकर