विद्यार्थ्यांना मिळणार आयुका पुणे अवकाश संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी — परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची विज्ञानवारी.
परभणी/प्रतिनिधी
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील आयुका (अवकाश संशोधन) संस्थेमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो. विद्यार्थ्यांना आयुका संस्था दाखविल्या जाते व अवकाश विज्ञान या विषयी अधिक माहिती तेथे देण्यात येते. याच उपक्रमाला ‘विज्ञानवारी’ असे नाव देण्यात आले आहे. मागील 14 वर्षापासून विज्ञान वारी अविरतपणे होत आहे. यामध्ये यावर्षी इयत्ता सातवी या इयत्तेतून एक विद्यार्थी निवडण्यात येतो.
परभणी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या मध्ये जिल्हा परिषद , आश्रम शाळा , खाजगी संस्था आणि इंग्लिश स्कूल यांचा समावेश करण्यात आला होता.
या वर्षी विज्ञानवारीची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी संबंधित शाळेमध्ये निर्धारीत वेळेमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा 30 गुणांची व 30 पर्यायी प्रश्नांची(MCQ) होती व परीक्षेचे माध्यम दोन्ही मराठी व इंग्रजी भाषा होते.
परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या भूगोल, विज्ञानासाठीच्या पुस्तकातील खगोलशास्त्र यावरील आधारित पाठांवर आधारित तसेच खगोलशास्त्रातील चालू घडामोडींवर विविध प्रश्न विचारण्यात आले होते.
विज्ञान वारी पात्रता पूर्व परीक्षेसाठी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकलच्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतले
Online परीक्षेची link 👆 वेळ: दुपारी 2 नंतर इयत्ता: 7 वी
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की दुपारी 2 नंतर Online परीक्षा देताना 15 मिनिटांच्या आत Submit करणे आवश्यक आहे. 15 मिनिटांनंतरचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
निवडीसंदर्भात सर्व अधिकार संयोजन समितीकडे असतील. नियम व अटी लागू
भटनागर यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे क्रमाक्रमाने भारतात १४ राष्ट्रीय प्रयोगशाळांची मालिका निर्माण झाली. अशा प्रकारे भारतात विविध वैज्ञानिक शाखांतील पद्धतशीर संशोधनाला भटनागर यांच्या परिश्रमामुळे बहुमोल चालना मिळाली. पुढे १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘नैसर्गिक साधनसंपत्ती व वैज्ञानिक संशोधन’ या मंत्रालयाचे पहिले सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांनी विरल मृत्तिका, किरणोत्सर्गी (भेदक किरण वा कण बाहेर टाकणारी) खनिजे. गंधकयुक्त खनिजे, खनिज तेल इत्यादींचे भारतातील साठे शोधण्याच्या कार्याला चालना दिली.
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाचे १९५४ मध्ये ते सचिव झाले. विद्यापीठ अनुदान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. वैज्ञानिक शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक शासकीय व्याप साभांळून त्यांनी वैयक्तिक संशोधनही चालू ठेवले होते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी औद्योगिक दृष्टया उपयुक्त अशा विविध द्रव्यांच्या निर्मितीच्या प्रकिया शोधून काढल्या (उदा., विषारी वायूचा वा धुराचा परिणाम न होणारे व कापडावर लेप देता येणारे रोगण, फेसाळ रबराच्या निर्मितीसाठी योग्य असा विद्राव, विस्फोटक द्रव्यांच्या साठवणीसाठी लागणारी विशिष्ट प्रकारची पात्रे. न फुटणारे व काचसदृश गुणधर्म असलेले पदार्थ आणि त्यांपासून उपयुक्त उपकरणे बनविणे, कृषी व्यवसायातील टाकाऊ पदार्थापासून प्लॅस्टिके तयार करणे वगैरे). त्यांना अनेक रासायनिक प्रक्रियांची व उपकरणांची एकस्वे मिळालेली होती.
भटनागर यांना त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले. ब्रिटिश सरकारने १९३६ मध्ये, ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ व १९४१ मध्ये ‘नाइट’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. ऑक्सफर्ड, पाटणा, अलाहाबाद, लखनौ, आग्रा व सागर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला. १९४३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थाचे सदस्य म्हणून निवड होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची नंतर निवड झाली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्टस ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेचं सदस्यत्व मिळणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत. भारतीय विज्ञान परिषदेच्या रसायनशास्त्र शाखेचे १९२८ व १९३८ मध्ये ते अध्यक्ष होते आणि १९४५ साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी सु. १७० संशोधनात्मक निबंध व लेख लिहीले. त्यांच्या इलमुलवर्क हा विद्यूत शास्त्रावरील उर्दु ग्रंथ व लाजवंती हा उर्दु कवितांचा संग्रह हेही प्रसिद्ध आहेत.
तरूण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ यांनी केलेल्या लक्षणीय महत्वाच्या संशोधनाला योग्य मान्यता मिळण्यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे भटनागर यांच्या स्मरणार्थ १९५७ पासून प्रतिवर्षी पाच ते सहा ‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिके’ देण्यात येत आहेत. ही पारितोषिके ४५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञांना त्यांनी पारितोषिक देण्यात येणाऱ्या वर्षाच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या भौतिकीय, रासायनिक, जीववैज्ञानिक, अभियांत्रिकीय, वैद्यकीय, गणितीय वा इतर विज्ञानांत केलेल्या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल देण्यात येतात.
ब्रूनोचा आज शहीद दिन. धर्माने विज्ञान जाळून टाकले, तो हा दिवस.
जियोर्दानो ब्रूनो १६ व्या शतकातील प्रसिद्ध दार्शनिक, खगोलशास्त्री, गणितज्ञ आणि कवी होता. त्याने ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या खगोल वैज्ञानिक निकोलस कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन केले. त्यावेळी संपूर्ण युरोप हा धर्माच्या बाबतीत आंधळा झाला होता.
‘ब्रह्माण्डाचे केंद्र पृथ्वी नसून, सूर्य आहे’; या कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन करताना ब्रूनो म्हणाला, – — ‘आकाश आपल्याला जेवढे दिसते, तेवढे नाही. ते अनंत आहे. त्याच्यात असंख्य विश्वे आहेत.’
— ‘या ब्रह्मांडात अगणित ब्रह्मांडे आहेत. ब्रह्मांड अनंत आणि अथांग आहे.’
— ‘आपला जसा परिवार असतो तसा प्रत्येक ताऱ्याचा आपला एक परिवार आहे. सूर्या प्रमाणे प्रत्येक तारा आपल्या परिवाराचा केंद्र आहे.’
— ‘फक्त पृथ्वीच नाही तर सूर्यसुद्धा आपल्या अक्षाभोवती फिरत आहे.’
जियोर्दानो ब्रूनो हा *निर्भीड आणि क्रांतिकारी विचारांचा* होता.
क्रांतिकारी अशा अर्थाने की, त्याचे विचार चर्चला मान्य नव्हते. ते बायबलच्या विरुध्द होते.चर्चचे पाद्री धर्माने आंधळे झाले होते. त्यांनी ब्रुनोला विरोध केला. त्याला आठ वर्षे तुरुंगात, एकांतवासात ठेवले. पण ब्रुनो घाबरला नाही. हिम्मत हरला नाही. ब्रूनो धर्मांध पाद्रींना म्हणाला – ‘धर्म तोच आहे,ज्यामध्ये सर्व धर्माचे अनुयायी आपापसात एक-दुसऱ्याच्या धर्माबाबत मोकळेपणी चर्चा करु शकतील.” ब्रुनो तुरुंगातल्या एकांतवासातही ऐकत नाही, हे पाहून स्वत:ला ख्रिश्चन धर्माचे ठेकेदार समजणारे पाद्री चिडले. त्यावेळचे पोप आणि पाद्री यांनी त्याला तुरुंगातून बाहेर काढले. रोम शहराच्या मध्यवर्ती चौकात आणले. त्याला खांबाला बांधले. त्याच्या अंगावर तेल टाकले. आणि पेटवून दिले.त्याच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून जोरजोराने चर्चच्या घंटा वाजवल्या. त्या घंटानादात ब्रुनोच्या किंकाळ्या विरून गेल्या. कोणालाही ऐकू आल्या नाहीत. पण त्याने सांगितलेले सत्य मात्र नंतर जगाला ऐकावेच लागले.नीच धर्मांधांचा पराभव झाला. पण ब्रुनोला त्यांनी जाळल्यानंतर.एक ना एक दिवस जगाला सत्य स्वीकारावेच लागेल यावर ब्रुनोचा विश्वास होता. मरताना त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. उलट आपल्या विचारांशी व निष्कर्षाशी तो ठाम राहिला. हिम्मत हरला नाही. त्याने बिनधास्तपणे मृत्यूला कवटाळले. त्याने मृत्यूला कवटाळेला दिवस होता;—
१७ फेब्रुवारी १६००.
आज त्याचे पुण्यस्मरण.🙏
रोममध्ये ‘Campo de’ Fiori’ या चौकात ब्रुनोला जिवंत जाळण्यात आले. १८८९ पासून त्या चौकात ‘धर्म आणि विज्ञान’ याचा सदसद्विवेक बुध्दीने विचार करणाऱ्या जियोर्दानो ब्रुनोचा पुतळा दिमाखात उभा आहे.